AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जावेद अख्तर बदनामी प्रकरणी कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका, अभिनेत्रीची याचिका फेटाळली

जावेदने कंगनाविरोधात नोव्हेंबर 2020 मध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यानंतर डिसेंबरमध्ये कोर्टाने जुहू पोलिसांना कंगनाच्या विरोधात तपास करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून कंगना आणि जावेद यांच्यात वाद सुरू आहे.

जावेद अख्तर बदनामी प्रकरणी कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका, अभिनेत्रीची याचिका फेटाळली
जावेद अख्तर बदनामी प्रकरणी कंगनाला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 7:15 PM
Share

मुंबई : गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेली बदनामीची कारवाई रद्द करण्याची अभिनेत्री कंगना रनौतची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर जेव्हा अभिनेत्रीने जावेद अख्तर यांच्याविरोधात टीव्ही मुलाखतींमध्ये निवेदने दिली तेव्हा ही बाब सुरू झाली. यानंतर जावेदने कंगनाच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला. जावेद यांनी कंगनावर त्यांच्याविरुद्ध खोटी विधाने करून आपली प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला होता. कंगनाने आपल्या याचिकेमध्ये कलम 482 सीआरपी सारख्या याचिकेमध्ये जावेदच्या तक्रारीनंतर पोलिसांना चौकशीचे आदेश देण्याचा दंडाधिकाऱ्यांचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. (Mumbai High Court rejects Kangana’s plea in Javed Akhtar defamation case)

कधी केला खटला दाखल

जावेदने कंगनाविरोधात नोव्हेंबर 2020 मध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. यानंतर डिसेंबरमध्ये कोर्टाने जुहू पोलिसांना कंगनाच्या विरोधात तपास करण्याचे आदेश दिले होते. तेव्हापासून कंगना आणि जावेद यांच्यात वाद सुरू आहे. कंगनाला हे प्रकरण लवकरात लवकर संपुष्टात आणावे असे वाटत असले तरी जावेद तसे करण्याच्या मनस्थितीत नाहीत. कंगनाच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचं झालं तर आजकाल ती थलायवी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीचा चित्रपट 10 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री खूप जोरदार या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे.

मुंबईत थिएटर सुरू करण्याची मागणी

कंगनाला तिचा थलायवी चित्रपट मुंबईतील चित्रपटगृहांमध्येही प्रदर्शित व्हावा अशी इच्छा आहे, म्हणून तिने महाराष्ट्र सरकारकडे चित्रपटगृहे सुरु करण्याची मागणी केली होती. पण जेव्हा तिची मागणी ऐकली नाही तेव्हा अभिनेत्रीने त्यांना लक्ष्य केले. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर एक नोट शेअर केली ज्यामध्ये लिहिले होते की रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, कार्यालये, लोकेटर ट्रेन सर्व महाराष्ट्रात खुली आहेत, परंतु कोविडमुळे चित्रपटगृहे बंद आहेत. महाराष्ट्र सरकारच्या मते, कोविड केवळ चित्रपटगृहांमध्ये पसरू शकतो. थलायवीमध्ये अभिनेत्री दिवंगत जे जयललिता यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून तिचा अभिनेत्री ते मुख्यमंत्री असा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात कंगनासोबत अरविंद स्वामी मुख्य भूमिकेत आहेत. (Mumbai High Court rejects Kangana’s plea in Javed Akhtar defamation case)

इतर बातम्या

T20 world Cup 2021: टी-20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन दिग्गज खेळाडूंना डच्चू

Ford भारतातील दोन्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बंद करणार, अध्यक्षांनी सांगितली कारणं…

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.