AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परराज्यातून टोळी यायची, नागपुरात मोबाईल चोरायची, या देशात नेऊन विक्री…

आता ती मोबाईल चोरट्यांची टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. या माहितीवरून पोलिसांनी यांचा शोध घेतला. ही टोळी ऑटोमोटिव्ह चौक परिसरात एक किरायाची खोली घेऊन राहत होती. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

परराज्यातून टोळी यायची, नागपुरात मोबाईल चोरायची, या देशात नेऊन विक्री...
परराज्यातील मोबाईल चोरटे जेरबंद
| Edited By: | Updated on: Sep 16, 2022 | 10:19 PM
Share

नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मोबाईल चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी झारखंड -बिहारमधून येऊन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करायची. चोरी केलेले मोबाईल बांगलादेशमध्ये विकायचे. या टोळीकडून 16 लाख रुपये किमतीचे 72 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागपुरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. गुन्हे शाखा पोलिसांनी मोबाईल चोरट्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, एक टोळी नागपुरात मोबाईल चोरीसाठी सक्रिय झाली आहे. ती वेगवेगळ्या राज्यात जाऊन मोबाईलची चोरी करते.

किरायाच्या खोलीत छापा

आता ती मोबाईल चोरट्यांची टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. या माहितीवरून पोलिसांनी यांचा शोध घेतला. ही टोळी ऑटोमोटिव्ह चौक परिसरात एक किरायाची खोली घेऊन राहत होती. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे. खोलीची झडती घेतली असता वेगवेगळ्या कंपनीचे 72 मोबाईल या ठिकाणी सापडले. या मोबाईलची किंमत 16 लाखांच्या घरात आहे. यामध्ये आणखीसुद्धा आरोपी असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक किशोर परबते यांनी दिली.

गर्दीच्या ठिकाणी चोरायचे मोबाईल

बिहारमधून निघून ही टोळी एक एक शहर गाठत होती. गर्दीचे ठिकाण शोधत होती. मोबाईल चोरीसाठी सावज हेरत होती. लहान मुलांच्या माध्यमातून त्या मोबाईलची चोरी करायची. लगेच दुसऱ्याकडे मोबाईल पास करत होती. त्या ठिकाणाहून पळ काढत.

अशाप्रकारे यांनी अनेक चोऱ्या केल्यात. हे सगळे मोबाईल झारखंड आणि बिहारमार्गे बांगलादेशमध्ये जात होते. तिथं कमी दरात विक्री करण्यात येत होती. त्यामुळे या टोळीचे मुळं कुठपर्यंत आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.