AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परराज्यातून टोळी यायची, नागपुरात मोबाईल चोरायची, या देशात नेऊन विक्री…

आता ती मोबाईल चोरट्यांची टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. या माहितीवरून पोलिसांनी यांचा शोध घेतला. ही टोळी ऑटोमोटिव्ह चौक परिसरात एक किरायाची खोली घेऊन राहत होती. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

परराज्यातून टोळी यायची, नागपुरात मोबाईल चोरायची, या देशात नेऊन विक्री...
परराज्यातील मोबाईल चोरटे जेरबंद
| Edited By: | Updated on: Sep 16, 2022 | 10:19 PM
Share

नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मोबाईल चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. ही टोळी झारखंड -बिहारमधून येऊन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करायची. चोरी केलेले मोबाईल बांगलादेशमध्ये विकायचे. या टोळीकडून 16 लाख रुपये किमतीचे 72 मोबाईल पोलिसांनी जप्त केले. यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागपुरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. गुन्हे शाखा पोलिसांनी मोबाईल चोरट्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, एक टोळी नागपुरात मोबाईल चोरीसाठी सक्रिय झाली आहे. ती वेगवेगळ्या राज्यात जाऊन मोबाईलची चोरी करते.

किरायाच्या खोलीत छापा

आता ती मोबाईल चोरट्यांची टोळी नागपुरात सक्रिय झाली आहे. या माहितीवरून पोलिसांनी यांचा शोध घेतला. ही टोळी ऑटोमोटिव्ह चौक परिसरात एक किरायाची खोली घेऊन राहत होती. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला.

पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा सुद्धा समावेश आहे. खोलीची झडती घेतली असता वेगवेगळ्या कंपनीचे 72 मोबाईल या ठिकाणी सापडले. या मोबाईलची किंमत 16 लाखांच्या घरात आहे. यामध्ये आणखीसुद्धा आरोपी असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. अशी माहिती गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक किशोर परबते यांनी दिली.

गर्दीच्या ठिकाणी चोरायचे मोबाईल

बिहारमधून निघून ही टोळी एक एक शहर गाठत होती. गर्दीचे ठिकाण शोधत होती. मोबाईल चोरीसाठी सावज हेरत होती. लहान मुलांच्या माध्यमातून त्या मोबाईलची चोरी करायची. लगेच दुसऱ्याकडे मोबाईल पास करत होती. त्या ठिकाणाहून पळ काढत.

अशाप्रकारे यांनी अनेक चोऱ्या केल्यात. हे सगळे मोबाईल झारखंड आणि बिहारमार्गे बांगलादेशमध्ये जात होते. तिथं कमी दरात विक्री करण्यात येत होती. त्यामुळे या टोळीचे मुळं कुठपर्यंत आहेत, याचा शोध पोलीस घेत आहेत.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.