AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik : बाकड्यावर बसण्याचा किरकोळ वाद नि हत्येचा थरार, किशोरवयीन मुलांमधील ही क्रुरता तुम्हाला ही हदरवणार

Nashik Crime News : नाशिकमधून एक हदरवणारी घटना समोर आली आहे. बाकड्यावर बसण्याच्या किरकोळ वादातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांमधील ही क्रुरता का वाढत आहे, असा सवाल करण्यात येत आहे.

Nashik : बाकड्यावर बसण्याचा किरकोळ वाद नि हत्येचा थरार, किशोरवयीन मुलांमधील ही क्रुरता तुम्हाला ही हदरवणार
| Updated on: Aug 03, 2025 | 10:16 AM
Share

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बाकड्यावर बसण्याच्या किरकोळ वादातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याची त्याच्या मित्रांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. सातपूर परिसरातील या घटनेने सर्वांनाच धक्का बसला. हा सगळा प्रकार एका खासगी क्लासेसच्या आवारात घडला. सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहो. पोलिसांना दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

खाजगी क्लास मध्ये बेंच वर बसण्याहून झालेल्या वादात शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली. नाशिकच्या सातपूर भागातील धक्कादायक घटनेने समाजमन हेलावले आहे. सातपूर भागात असलेल्या ज्ञानगंगा क्लास मध्ये शिकणाऱ्या यशराज गांगुर्डे या दहावीत शिकणाऱ्या मुलाची हत्या झाली. मयत यशराजचे त्याच्या क्लास मध्ये शिकणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांसोबत बेंच वर बसण्याहून बुधवारी वाद झाला होता. तेव्हापासून आरोपी त्याला सारखे डिवचत होते आणि खुन्नस देत होते.

रिक्षा चालकाने नेले रुग्णालयात

अशोकनगरातील यशराज तुकाराम गांगुर्डे हा नेहमीप्रमाणे 2 ऑगस्ट रोजी त्याच भागातील राज्य कर्मचारी वसाहतीतील ज्ञानगंगा क्लास या खासगी शिकवणीसाठी गेला होता. पण थोड्या वेळानंतर तो हिरे गार्डन येथे सायंकाळी 6.15 वाजता बेशुद्धावस्थेत आढळला होता. रिक्षाचालक नवनाथ अवचार यांनी त्याला तातडीने औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

या वादातून यशराजला खाजगी क्लासच्या आवारात त्याच्याच शिकवणीमधील शिकणाऱ्या 2 मित्रांनी मारहाण केली. हाताच्या चापटी आणि लाथा बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत यशराज याचा मृत्यू झाला. यशराज गांगुर्डे हा या मारहाणीत गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारापूर्वीच त्याने प्राण सोडले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. या हत्ये प्रकरणी 2 विधी संघर्षात बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल तपास सुरू आहे. मुलांची चौकशी करण्यात येत आहे. पण या घटनेने लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये वाढणारी गुन्हेगारी प्रवृत्ती पालकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.