AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Crime | तलवारी घेत नंगानाच करणाऱ्या भाईंची इलाक्यातच जिरवली मस्ती, पोलिसी खाक्या कसा असतो, जाणून घ्याच!

देशभरात नाशिकचे उद्योनगरी आणि पर्यटननगरी म्हणून नाव विख्यात आहे. आता याच नगरीची क्राईमनगरीकडे होणारी वाटचाल अतिशयक धक्कादायक आणि धोकादायक अशीच आहे.

Nashik Crime | तलवारी घेत नंगानाच करणाऱ्या भाईंची इलाक्यातच जिरवली मस्ती, पोलिसी खाक्या कसा असतो, जाणून घ्याच!
नाशिकमधील सातपूर भागात पोलिसांनी गुन्हेगारांची धिंड काढून मस्ती उतरवली.
| Edited By: | Updated on: Feb 07, 2022 | 12:22 PM
Share

नाशिकः देशभरात नाशिकचे (Nashik) उद्योनगरी आणि पर्यटननगरी म्हणून नाव विख्यात आहे. आता याच नगरीची क्राईम (Crime) नगरीकडे होणारी वाटचाल अतिशयक ही धक्कादायक आणि धोकादायक अशीच आहे. काही दिवसांपूर्वी एकामागे एक झालेले तीन खून. त्यात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची झालेली हत्या. या साऱ्या घटनांनी राज्य ढवळून निघाले. हे प्रकरण थेट विधिमंडळात पोहचले. आता त्याच नाशिकमध्ये चक्क हातात कोयते आणि तलवारी घेऊन काही भाई लोकांनी चक्क रस्त्यावर नंगानाच केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हे सारे खून, हाणामाऱ्या प्रकरणातील आरोपी आहेत. याचा सुगावा पोलिसांनी लागताच त्यांनी या भाई लोकांची मस्ती चक्क धिंड काढून जिरवली. त्यानंतर कोणी पुन्हा असा प्रकार करायला धजावणार नाही, असा पोलिसी इंगा त्यांना दाखवला. तुम्हीही हा पोलिसी खाक्या जरूर जाणून घ्या…

नेमके प्रकरण काय?

नाशिकमधल्या सातपूर भागातली ही घटना. या परिसरात अनेकजण भाईगिरी करायला पुढे असतात. हाताता काम नसते. त्यात भाईगिरी करायला कसलीही गुंतवणूक म्हणा अथवा श्रम करावे लागत नाहीत. एखादे टोळके सोबत असले की, लोकही आपोआप नरमतात. मात्र, या लोकांची भाईगिरी जास्त झाली. त्यातले अनेकजण खून, हाणामारी प्रकरणातले आरोपी. त्यांनी हातात कोयते, तलवारी घेऊन चक्क रस्त्यावर नंगानाच केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना वठणीवर आणण्यासाठी अखेर पोलिसी खाक्याचा हिसका दाखवला.

पोलिसांनी काय केले?

सातपूर परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे सरसावले आहेत. मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच येथील पदभार घेतलाय. त्यांच्या कानावर ही बातमी पडली. त्यांनी संशयितांचा शोध सुरू केला. तेव्हा सातपूर परिसरातील सराईत गुन्हेगार अक्षय पाटील, शुभम राजगुरू आणि इतरांचा त्यात समावेश असल्याचे समोर आले. पोलिसांनी या भाईंची मस्ती उतवरवण्यासाठी चक्क भाईच्या इलाक्यातून धिंड काढली. सोबत पार्श्वभागावर पोलिसांचे बसणारे फटके होतेच. ही धिंड पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली. येथून पुढेही गुन्हेगारांची खैर नाही, असा इशारा पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी दिला आहे. पोलिसांनी असेच काम केले, तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल, यात शंकाच नाही.

इतर बातम्याः

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास

Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.