AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ACB ची मोठी कारवाई! एकीकडे बळीराजा निसर्गाशी दोन हात करतोय, दुसरीकडे कृषी अधिकाऱ्यांकडून संतापजनक कृत्य

एकीकडे बळीराजा संकट असतांना त्याला मानसिक आधार देण्याची गरज असतांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत कृषी अधिकाऱ्याने संतापजनक कृत्य केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

ACB ची मोठी कारवाई! एकीकडे बळीराजा निसर्गाशी दोन हात करतोय, दुसरीकडे कृषी अधिकाऱ्यांकडून संतापजनक कृत्य
Image Credit source: Google
| Updated on: Apr 22, 2023 | 6:48 PM
Share

नाशिक : एकीकडे शेतकरी संकटात असतांना दुसरीकडे कृषी अधिकाऱ्याने केलेल्या कृत्याचा संताप व्यक्त केला जात आहे. खरंतर कृषी अधिकाऱ्यांनी शासनाचे दूत म्हणून शेतकऱ्यांना मानसिक बळ देण्याचे गरज असतांना सिन्नर येथील कृषी अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाई नंतर संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील कृषी अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पन्नास हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ अटक केली आहे. अण्णासाहेब हेमंत गागरे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर मात्र शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.

लाचखोर अधिकारी अण्णासाहेब हेमंत गागरे याने कारखानदाराने शेतकऱ्यांना वितरित केलेल्या वस्तूंवर सबसीडी मिळवून देण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेतांना अटक केली आहे.

गागरे यांच्याकडे सिन्नरसह निफाड तालुक्याचा देखील अतिरिक्त परभर आहे. तक्रारदार हा सिन्नर येथील असून त्याचा शेती अवजारे तयार करण्याचा कारखाना आहे. त्याच्याकडून लाच घेतांना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून दिली जाणारी सबसीडी लाटण्याचा हा प्रकार होता. शेतकऱ्यांना दिलेली अवजारे ही पात्र नसून त्याकरिता तुम्हाला चार लाख रुपये द्यावे लागतील त्यानंतर अनुदान मिळेल यासाठी ही लाच मागितली होती.

विशेष म्हणजे हा अधिकारी चार लाखांवरून दोन लाखांवर आला होता. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पन्नास हजार रुपये देत असतांना ही कारवाई करण्यात आली आहे. गागरे याने दुपारी एक मीटिंग झाल्यावर कार्यालयाच्या बाहेर अचानक निघून गेले होते.

दुपारी ठरलेल्या ठिकाणी लाच घेण्यासाठी गेले असतांना एसीबीने रचलेल्या सापळ्यात कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे अडकला गेला. त्यानंतर कार्यालयात सायंकाळी ही कारवाईची माहिती मिळाल्याने खळबळ उडाली असून उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

एकीकडे शेतकरी अडचणीत असतांना त्यांची मदत करण्यासाठी प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करण्यासाठी बांधावर न जाता इकडे लाच घेण्याचा उद्योग केल्याने शेतकरी वर्गात संताप निर्माण झाला असून लाचखोर कृषी अधिकाऱ्यावर सडकून टीका केली जात आहे.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.