AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने गावकरी संतापले, प्राण्यांचा बळी देत 40 जणांनी…

ओडिशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगढ़ा जिल्ह्यातील काशीपूर ब्लॉकच्या बैगांगुडा गावात प्रेमविवाहाबाबत लोकांची असलेली मानसिकता समोर आली आहे.

मुलीने आंतरजातीय प्रेमविवाह केल्याने गावकरी संतापले, प्राण्यांचा बळी देत 40 जणांनी...
Odisha Crime news
| Updated on: Jun 21, 2025 | 10:08 PM
Share

भारतात आजही आंतरजातीय विवाह स्वीकारला जात नाही. असा विवाह केल्याने मुला-मुलींच्या कुंटुंबांना त्रासाचा सामना करावा लागतो. अशातच आता ओडिशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगढ़ा जिल्ह्यातील काशीपूर ब्लॉकच्या बैगांगुडा गावात प्रेमविवाहाबाबत लोकांची असलेली मानसिकता समोर आली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

समोर आलेल्या माहितीनुसार, या गावातील एका मुलीने दुसऱ्या गावातील अनुसूचित जातीच्या मुलाशी लग्न केले. यामुळे मुलीचे कुटुंब आणि तिच्या गावातील लोक तिच्यावर रागावले. हे जातीचे नियमांचे उल्लंघन आहे असं मानून गावकऱ्यांनी मुलीच्या कुटुंबावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी दबाव आणला, त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला ही प्राण्यांचा बळी देऊन ही प्रक्रिया केली. यात मुलीच्या 40 नातेवाईकांना मुंडन करावे लागले.

प्रेमविवाहासाठी कुटुंबाला शिक्षा

प्राथमिक माहितीनुसार, गावातील लोकांनी मुलीच्या कुटुंबावर दबाव आणला होता, जर त्यांना जातीत परत यायचे असेल तर त्यांना प्राण्यांचा बळी द्यावा लागेल आणि नंतर मुंडन संस्कार करावे लागतील असं गावकऱ्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे समाजाच्या दबावाखाली कुटुंबातील 40 सदस्यांनी मुंडन संस्कार केले.

ही घटना समोर येताच काशीपूरचे बीडीओ विजय सोय यांनी ब्लॉक अधिकाऱ्यांना गावात जाऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. आता तपासानंतरच सत्य बाहेर येणार आहे. तसेच या अधिकाऱ्यांना तपासात कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईही केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिकाऱ्यांकडून चौकशीला सुरुवात

देशात विविध ठिकाणी आजही जात-पात मानली जास असल्याचे चित्र आहे. समाजात जातीयवाद आणि वाईट प्रथा खोलवर रुजलेल्या आहेत. प्रेमविवाहासारख्या वैयक्तिक निर्णयानंतर शुद्धीकरण प्रक्रियेसाठी दबाव आणणे हे असंवैधानिक असून मानवी हक्कांचेही उल्लंघन आहे. मुंडन संस्कार करतानाचा एक व्हिडिओही समोर आलेला आहे. सध्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत