बारामती : आपण एरव्ही साहित्य किंवा पैसे चोरीला गेल्याची तक्रार झाल्याचं पाहतो. मात्र बारामती तालुक्यातील सुपे येथील एका विहिरीतून पाणी चोरल्या (Water Stealing)ची तक्रार वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश मारुती जाधव, विकास प्रकाश जाधव, राहुल ज्ञानेश्वर जाधव आणि अतुल ज्ञानेश्वर जाधव अशी तक्रार दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. निवृत्त पोलीस (Retired Police) कर्मचारी सुधाकर रोकडे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. जाधव यांना पाण्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलो असताना त्यांनी शिवीगाळ व धमकी (Threaten) दिल्याचंही रोकडे यांनी फिर्यादीत म्हटलंय. त्यानुसार पाणी चोरीसह धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.