AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डान्स करायला नकार दिला तर डायरेक्ट गोळीच झाडली, डबल मर्डर केसमध्ये पिता-पुत्राला जन्मठेप, अखेर ८ वर्षांनी न्याय मिळाला

Crime News : होळीच्या दिवशी गावात आनंदाचं वातावरण होतं. पण डान्स करण्यास नकार दिल्याने आरोपी भडकले आणि त्यांनी सरळ बंदूकीतून ..

डान्स करायला नकार दिला तर डायरेक्ट गोळीच झाडली, डबल मर्डर केसमध्ये पिता-पुत्राला जन्मठेप, अखेर ८ वर्षांनी न्याय मिळाला
अज्ञात कारणातून शिक्षकावर हल्ला
| Updated on: Jul 27, 2023 | 5:09 PM
Share

लखनऊ | 27 जुलै 2023 : होळीच्या रंगात नाहून निघालेल्या गावात अचानक एका घटनेमुळे रंगाचा बेरंग झाला. शुल्लक कारणावारून झालेल्या वादानंतर दोन तरूणांच्या (murder) झालेल्या हत्येने संपूर्ण गाव हादरलं. आठ वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय न्यायाची प्रतीक्षा करत होते. अखेर आज त्यांना न्याय मिळाला आणि मारेकरी पिता-पुत्र दोषी ठरले.

उत्तर प्रदेशातील पीलभीत येथील दुहेरी हत्याकांडातील ((Double murder case) सहा आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या सहा जणांमध्ये पिता-पुत्राचाही समावेश आहे. खरंतर हे प्रकरण ८ वर्षांपूर्वीचं आहे, तेव्हापासून मृताचे कुटुंबिय न्यायाची वाट बघत होते. अखेर आज आरोपींना दोषी ठरवत शिक्षा मिळाल्याने त्यांनी सुखाचा श्वास घेतला.

2015 साली देवरिया कोतवाली परिसरातील आंदा गावात होळीच्या दिवशी दोन तरूणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नृत्य करण्यास नकार दिल्याच्या शुल्लक कारणावरून हे हत्याकांड झालं. याच गावात राहणारे अरविंद, मुनेंद्र, केशव, राहुल यांनी कल्लू नावाच्या इसमाला डान्स करण्यास सांगितले होते, मात्र कल्लूने नाचण्यास सरळ नकार दिला. यामुळे ते सर्व संतापले आणि अरविंद, मुनेंद्र, केशव, राहुल रजनीश यांच्यासह केदारनाथ या इसमाने त्याच गावातील नन्हेलाल याच्या घराजवळ कल्लूला घेराव घातला. आणि कल्लूवर गोळ्या झाडल्या.

गंभीर जखमी झालेला कल्लू जमीनीवर कोसळला. गोळ्यांचा आवाज ऐकून वेद प्रकाश हा कल्लूला वाचवण्यासाठी पुढे सरसावला इतक्यात केदारनाथ याने वेदप्रकाशवरही गोळी झाडली. या दुर्दैवी घटनेत त्या दोघांचाही मृत्यू झाला.

न्यायालयाने जन्मठेपेसह ठोठावला दंड

याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने तब्बल ८ वर्षांनी या प्रकरणात पिता-पुत्रासह ६ जणांना दोषी ठरवले. न्यायाधीशांनी या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि दंडही ठोठावला. मृत तरूणांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलांना न्याय मिळावा यासाठी सतत 8 वर्षे न्यायालयात दाद मागितली.  अखेर आज त्यांना न्याय मिळाला.

Follow Us
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.