AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बैलगाडा शर्यत सुरु असतानाच ‘ती’ अफवा पसरली, लोकांकडून स्टेजवर दगडफेक

गोंदियात इनामी शंकरपट कार्यक्रमावेळी तरुणाच्या मृत्यूची अफवा पसरल्याने दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 52 लोकांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बैलगाडा शर्यत सुरु असतानाच 'ती' अफवा पसरली, लोकांकडून स्टेजवर दगडफेक
गोंदियात इनामी शंकरपटादरम्यान दगडफेकImage Credit source: TV9
| Updated on: Mar 07, 2023 | 8:11 AM
Share

गोंदिया / शाहिद पठाण : गोंदिया जिल्ह्याचा सडक अर्जुनी तालुक्यातील केसलवाडा येथे इनामी शंकरपटाला गालबोट लागल्याची घटना घडली. बैलगाडा शर्यत सुरु असताना एका तरुणाच्या मृत्यूच्या अफवेमुळे दगडफेकिची घटना घडली आहे. लोकांनी स्टेजवर दगडफेक केली. या गर्दीला पांगविण्यासाठी आलेल्या डुग्गीपार पोलिसांच्या वाहनावर देखील दगडफेक करण्यात आली. तसेच पोलीस वाहनाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात 52 लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तरुणाच्या मृत्यूची अफवा पसरल्याने दगडफेक

विदर्भातील मोठ्या इनामी शंकरपटाचे आयोजन केसलवाडा येथे करण्यात आले होते. हा शंकरपट पाहण्यासाठी परिसरातील शेकडो नागरिकांनी आणि पटशौकिनांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी पांगविण्यासाठी पटसमितीचे अध्यक्ष राजकुमार हेडाऊ यांनी काठीचा वापर केला. यात चंद्रहास परशुरामकर या तरुणाच्या डोक्यावर काठी लागल्याने यात त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने वातावरण तापले.

विविध कलमान्वये 52 लोकांवर गुन्हा दाखल

यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी पटसमितीच्या स्टेजच्या दिशेने दगडफेक सुरू केली. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचे वाहन आले असता, त्या वाहनावरही दगडफेक करून त्या वाहनाचे 5 हजार रूपयाचे नुकसान केले. शेवटी पट बंद करावा लागला. दरम्यान पोलीस हवालदार हरिश्चंद्र पंढरी शेंडे यांच्या तक्रारीवरून 52 लोकांवर डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम 143, 144, 145, 147, 149, 186, 353, 427, सहकलम सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 3, सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये दाखल करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे या पटाच्या फायनल मध्ये 7 लाख रुपयाचे संपूर्ण बक्षीस असल्यामुळे शेवटच्या जोड्या सुटण्याची वाट पाहत असताना नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यादरम्यान हा प्रकार घडला आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.