AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुकानात सामान घ्यायला गेला तो परत आलाच नाही, अल्पवयीन मुलांनीच केले मित्राचे अपहरण… कारण ऐकून व्हाल अवाक् !

गेम खेळण्यासाठी आणि मजा मस्ती करण्यासाठी काही अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच मित्राचं अपहरण केले. पण पैसे मिळाले नाहीत म्हणून त्यांनी...

दुकानात सामान घ्यायला गेला तो परत आलाच नाही, अल्पवयीन मुलांनीच केले मित्राचे अपहरण... कारण ऐकून व्हाल अवाक् !
| Updated on: Aug 28, 2023 | 5:54 PM
Share

कलकत्ता | 28 ऑगस्ट 2023 : कॉम्प्युटर गेम खेळण्यासाठी आणि मजा मस्ती करण्यासाठी पैसे मिळवण्याच्या इच्छेने तीन अल्पवयीन मुलांनी त्यांच्याच मित्राचे अपहरण (kidnapped friend) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे त्यांनी खंडणी म्हणून मोठी रक्कम मिळेल, भरपूर पैसे मिळतील अशी त्यांना अपेक्षा होता. मात्र त्यात अपयश आल्यावर त्यांनी स्वत:च्याच मित्राची गळा दाबून हत्या (crime news) केल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यात हा खळबळजनक प्रकार घडला.

मृतदेह नदीत फेकून दिला

एवढेच नव्हे तर त्यांनी मित्राचा मृतदेह एका कापडात बांधून सरळ नदीतच फेकून दिला. पकडले गेल्यावर त्यांनी पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. मृत मुलगा अवघ्या 14 वर्षांचा होता, त्याला वडील नव्हते.

पोलिसांसमोर दिली गुन्ह्याची कबूली

तीन अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी गुन्हा कबूल केला आहे. आपल्याला कॉम्प्युटर विकत घ्यायचा होता, म्हणून एका मित्राचे अपहरण करून त्याच्या आईला फोन करून खंडणी म्हणून तीन लाख रुपये मागितल्याचे आरोपींनी सांगितले. पण त्याची आई पैसे देऊ शकली नाही. म्हणून आरोपींनी मित्राला त्याची शेवटची इच्छा विचारली आणि त्याला कोल्डड्रिंक, रसगुल्लाही खायला दिला. त्यानंतर त्याचा जीव घेतला.

ही घटना जिल्ह्यातील कृष्णनगरच्या घुरनी भागातील आहे. मृत मुलगा हा आठव्या इयत्तेत शिकत होता. शुक्रवारी तो काही सामान विकत घेण्यासाठी दुकानात गेला, पण परत आलाच नाही. शनिवारी सकाळी त्याच्या आईला एक फोन आला व मुलाच्या बदल्यात त्यांच्याकडे तीन लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.

त्याच्या आईने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी फोनचा तपास करू मुलांचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली असता सर्व प्रकार उघड झाला. पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.