AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन बायकांनी नवऱ्याला कोर्टाच्या परिसरातच चोप चोप चोपले, कारण ऐकल्यावर तुमच्याही भुवया उंचावतील

फजलुर्रहमानच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार त्यांना 13 वर्षाचा मुलगा आहे. तो फजलुर्रहमान सोबत राहतो. त्यासाठी त्याने एकतर्फी आदेश मिळवला होता. त्यानंतर कोर्टात याचिका दाखल केल्यावर कोर्टाने पहिल्या पत्नीला मुलाला भेटण्याची परवानगी दिली.

तीन बायकांनी नवऱ्याला कोर्टाच्या परिसरातच चोप चोप चोपले, कारण ऐकल्यावर तुमच्याही भुवया उंचावतील
uttar pradeshImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 26, 2023 | 9:08 AM
Share

जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या शाहगंज तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. तीन बायकांनी आपल्या नवऱ्याला चोप चोप दिल्याची घटना घडली आहे. कोर्टाच्या परिसरातच हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या व्यक्तीने चार लग्नं केली होती. त्यापैकी तीन बायकांना सोडलं होतं. चौथी सोबत तो राहत होता. पहिल्या पत्नीला तर तिच्या मुलांनाही तो भेटू देत नव्हता. त्यामुळे संतापलेल्या या तीन बायकांनी त्याला बेदम मार दिला. त्यानंतर लोकांनी या नवरोबाला पोलिसांच्या स्वाधीन केलं. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

फजलुर्रहमान असं या व्यक्तीचं नाव आहे. तो वाराणासीच्या आदमपूर येथील पठानीटोला येथे राहतो. त्याने चार लग्न केले होते. त्याची पहिली बायको शाहगंज नगरच्या एराकियाना परिसरातील राहणारी आहे. त्याची दुसरी पत्नी कानपूरच्या जाजमऊ येथील रहिवासी आहे. तिसरी पत्नी आजमगडची आहे. मुलं झाल्यानंतर फजलुर्रहमानने त्यांना सोडून दिल्याचा या महिलांचा आरोप आहे. आता तो चौथ्या बायकोसोबत राहत आहे.

मुलाला भेटू देत नव्हता

फजलुर्रहमानच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार त्यांना 13 वर्षाचा मुलगा आहे. तो फजलुर्रहमान सोबत राहतो. त्यासाठी त्याने एकतर्फी आदेश मिळवला होता. त्यानंतर कोर्टात याचिका दाखल केल्यावर कोर्टाने पहिल्या पत्नीला मुलाला भेटण्याची परवानगी दिली. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी तिला भेटण्याची परवानगी दिली. पण नवरा आपल्याला मुलाला भेटू देत नाही, असा या महिलेचा आरोप आहे.

अन् मोका साधला

गुरुवारी शाहगंज तालुक्यातील ग्रामीण न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होती. या सुनावणीला हजर राहण्यासाठी फजलुर्रहमान आला होता. तो येताच त्याच्या तिन्ही बायकांना त्याला धरलं आणि येथेच्छ धुलाई केली. कोर्टाच्या बाहेरच हा प्रकार घडला. त्यामुळे बघ्यांची गर्दी जमली.

पोलीस म्हणतात, घर की बात

त्यानंतर लोकांनी फजलुर्रहमानला पोलिसांच्या हवाली केलं. शाहगंज पोलिसांनी हा आपआपसातील वाद असल्याचं सांगितलं. तसेच दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, झालेल्या प्रकाराची सध्या उत्तर प्रदेशात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Follow Us
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...