AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कौटुंबिक कामासाठी चालले होते, मात्र जिवंत घरी परतलेच नाही, कुटुंबासोबत नेमके काय घडले?

कौटुंबिक कामासाठी साहू परिवार अर्जुनी येथे आला होता. यावेळी भाटापारा मार्गावर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला. गाडीतील एकाच कुटुंबातील 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 12 सदस्य गंभीर जखमी आहेत.

कौटुंबिक कामासाठी चालले होते, मात्र जिवंत घरी परतलेच नाही, कुटुंबासोबत नेमके काय घडले?
सोलापुरात कंटेनर आणि बाईक अपघातात एक ठारImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 24, 2023 | 2:31 PM
Share

रायपूर : कौटुंबिक कामासाठी चाललेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक घटना छत्तीसमधील रायपूरमध्ये उघडकीस आली आहे. ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाल्याने एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू झाला, तर 12 कुटुंबातील अन्य जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. छत्तीसगडमधील भाटापारा मार्गावर बलौदा बाजार येथे ही दुर्दैवी घटना घडली.

ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक

कौटुंबिक कामासाठी साहू परिवार अर्जुनी येथे आला होता. यावेळी भाटापारा मार्गावर ट्रक आणि पिकअप व्हॅनमध्ये जोरदार धडक झाली. या धडकेत पिकअप व्हॅनचा चक्काचूर झाला. गाडीतील एकाच कुटुंबातील 11 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य 12 सदस्य गंभीर जखमी आहेत. घटनेमुळे भाटापारा मार्गावर एकच गोंधळ उडाला.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले

अपघाताची स्थानिक पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळतचा स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. अपघातातील जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर अपघातात मृत्यू झालेल्या 11 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.