AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वहिनी रोज टोचून बोलायची आणि जीव खायची, मग दीराने एक मळ्यात…

बस्तीत एका दीराने आपल्या वहिनीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. वारंवार टोमणे आणि शिवीगाळ करत असल्याने दीर वैतागला होता.

वहिनी रोज टोचून बोलायची आणि जीव खायची, मग दीराने एक मळ्यात...
वहिनीचं रोजचं बोलणं जिव्हारी लागायचं, मग त्या दिवशी त्याने कशाचीही पर्वा न करता...Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Mar 21, 2023 | 8:05 PM
Share

बस्ती : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा 24 तासानंतर झाला आहे. शिवीगाळ, टोमणे याला कंटाळून दीरानेच तिची गळा चिरून हत्या केल्याचं उघड झालं आहे. सदर महिलेची हत्या करून तिचं शव मोहरीच्या शेतात लपवून ठेवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. वहिनीचे टोमणे आणि शिव्यांना वैतागून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय कुमार यादव 18 मार्च 2023 रोजी रात्री साडे दहा वाजता शेताची राखण करण्यास गेला होता. जवळच मृत वहिनीचं शेत आहे आणि तीही तिथेच होती. दीरा पाहता क्षणीत महिलेनं शिव्या आणि टोमणे मारण्यास सुरुवात केली. तिला गप्प राहण्यास सांगितलं असतान तिने विटा फेकण्यास सुरुवात केली.

आरोपी अजयला या कृतीमुळे राग अनावर झाला आणि तो वहिनीच्या दिशेने विटांचे तुकडे घेऊन धावला. तीने तेव्हा घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिला पकडलं आणि जमिनीवर पाडून डोक्यात विट घातली. मग तिच्या हातातील विळा घेऊन तिचा गळा चिरला.

महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचं पाहून अजय घाबरला आणि पुरावा लपवण्यासाठी धडपड सुरु झाली. शर्टाला लागलेला रक्ताचे डाग लपवण्यासाठी ते जाळून टाकलं. तसेच घरी आल्यानंतर रात्रभर झोपला नाही. दुसऱ्या दिवशी संतकबीर नगरला जात असताना पोलिसांनी त्याचा मुसक्या आवळल्या.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “हत्येच्या दिवशी नेमकं काय झालं असावं याचा आम्ही तपास करत होतो. तसा घटनास्थळी कोणताच पुरावा नसल्याने आम्हाला नातेवाईकावर संशय आला. तो तीचा दीर होता आणि त्यांच्यात वाद होता. त्यामुळे मृत महिला त्याला टोमणे मारायची. त्यामुळे त्याने तिची हत्या केली.” याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अजय कुमार यादवला अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.

आरोपी अजय कुमारनं सांगितलं की, माझ्या बहिणीचं लग्न वहिनीमुळे जमत नव्हतं.त्यामुळे नाराज झालो होतो. तीन वेळा नवऱ्याकडच्या मंडळींना भडकवून लग्न मोडलं होतं.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...