AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वहिनी रोज टोचून बोलायची आणि जीव खायची, मग दीराने एक मळ्यात…

बस्तीत एका दीराने आपल्या वहिनीची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली आहे. वारंवार टोमणे आणि शिवीगाळ करत असल्याने दीर वैतागला होता.

वहिनी रोज टोचून बोलायची आणि जीव खायची, मग दीराने एक मळ्यात...
वहिनीचं रोजचं बोलणं जिव्हारी लागायचं, मग त्या दिवशी त्याने कशाचीही पर्वा न करता...Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: Mar 21, 2023 | 8:05 PM
Share

बस्ती : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी महिलेचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा उलगडा 24 तासानंतर झाला आहे. शिवीगाळ, टोमणे याला कंटाळून दीरानेच तिची गळा चिरून हत्या केल्याचं उघड झालं आहे. सदर महिलेची हत्या करून तिचं शव मोहरीच्या शेतात लपवून ठेवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. वहिनीचे टोमणे आणि शिव्यांना वैतागून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अजय कुमार यादव 18 मार्च 2023 रोजी रात्री साडे दहा वाजता शेताची राखण करण्यास गेला होता. जवळच मृत वहिनीचं शेत आहे आणि तीही तिथेच होती. दीरा पाहता क्षणीत महिलेनं शिव्या आणि टोमणे मारण्यास सुरुवात केली. तिला गप्प राहण्यास सांगितलं असतान तिने विटा फेकण्यास सुरुवात केली.

आरोपी अजयला या कृतीमुळे राग अनावर झाला आणि तो वहिनीच्या दिशेने विटांचे तुकडे घेऊन धावला. तीने तेव्हा घटनास्थळावरून पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिला पकडलं आणि जमिनीवर पाडून डोक्यात विट घातली. मग तिच्या हातातील विळा घेऊन तिचा गळा चिरला.

महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचं पाहून अजय घाबरला आणि पुरावा लपवण्यासाठी धडपड सुरु झाली. शर्टाला लागलेला रक्ताचे डाग लपवण्यासाठी ते जाळून टाकलं. तसेच घरी आल्यानंतर रात्रभर झोपला नाही. दुसऱ्या दिवशी संतकबीर नगरला जात असताना पोलिसांनी त्याचा मुसक्या आवळल्या.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “हत्येच्या दिवशी नेमकं काय झालं असावं याचा आम्ही तपास करत होतो. तसा घटनास्थळी कोणताच पुरावा नसल्याने आम्हाला नातेवाईकावर संशय आला. तो तीचा दीर होता आणि त्यांच्यात वाद होता. त्यामुळे मृत महिला त्याला टोमणे मारायची. त्यामुळे त्याने तिची हत्या केली.” याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अजय कुमार यादवला अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणी आणखी तपास करत आहेत.

आरोपी अजय कुमारनं सांगितलं की, माझ्या बहिणीचं लग्न वहिनीमुळे जमत नव्हतं.त्यामुळे नाराज झालो होतो. तीन वेळा नवऱ्याकडच्या मंडळींना भडकवून लग्न मोडलं होतं.

Follow Us
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल
संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले...
Sanjay Raut | संजय राऊत यांचा अमित शाह, निवडणूक आयोगावर घणाघात; म्हणाले, बाळासाहेबांचा पक्ष-चिन्ह....
मनीषा कायंदे यांचा संजय राऊतांवर घणाघात; शिंदेंची बाजू घेत सुनावलं...
Manisha Kayande On Sanjay Raut | संजय राऊतांसारखा बोगस माणूस भारतात दिसला नाही! मनीषा कायंदेंचा घणाघात; शिंदेंची बाजू घेत राऊतांना सुनावलं
अमरावती आश्रमशाळा वसतीगृहात 48 ऐवजी 110 मुली एका खोलीत
अमरावती आश्रमशाळा वसतीगृह: क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थिनी, जीवाशी खेळ सुरु
सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला,आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर
नांदेडमध्ये सुखबीर सिंग बादल यांच्यावर हल्ला: एटीएसकडून तपास सुरु, आरोपी जसपाल सिंगच्या पुण्यातील घरावर छापा