AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मामा-मामीसह तिघा भावंडांची गळा चिरुन हत्या, जमिनीच्या लोभातून कुटुंब संपवलं

आरोपीने सख्खा मामा-मामी आणि त्यांच्या तीन मुलांची राहत्या घरी गळा चिरुन हत्या केली. (Ayodhya Nephew Killed Uncle's Family)

मामा-मामीसह तिघा भावंडांची गळा चिरुन हत्या, जमिनीच्या लोभातून कुटुंब संपवलं
अयोध्येत पाच जणांच्या हत्येने खळबळ
| Updated on: May 23, 2021 | 11:07 AM
Share

लखनौ : जमिनीच्या वादातून भाच्यानेच मामा-मामीसह तिघा मामेभावंडांची गळा चिरुन हत्या केली. उत्तर प्रदेशातील अयोध्येत पाच जणांच्या सामूहिक हत्याकांडाने एकच खळबळ (Ayodhya Five People Murder) उडाली आहे. सख्ख्या मामाच्या कुटुंबातील पाच जणांना संपवणाऱ्या क्रूर भाच्याच्या शोधासाठी पोलिसांनी छापेमारी सुरु केली आहे. (Uttar Pradesh Crime Ayodhya Nephew Killed Five Members of Uncle’s Family)

आरोपीने सख्खा मामा-मामी आणि त्यांच्या तीन मुलांची राहत्या घरी गळा चिरुन हत्या केली. प्राथमिक तपासानुसार दोघांमध्ये प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होते. हत्येनंतर आरोपी भाचा घटनास्थळावरुन पसार झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांचीही या प्रकरणी कसून चौकशी केली जात आहे.

आरोपी भाचा-मामा एकाच घरात राहणारे

अयोध्येतील निसारु गावात आरोपी भाचा आपल्या मामाच्या कुटुंबासोबत एकाच घरात राहत होता. जमिनीवरुन दोघांमध्ये दीर्घ काळापासून वाद सुरु होते. शनिवारी रात्री मामाचं कुटुंब झोपेत असताना भाच्याने त्यांचे गळे चिरले. हे वृत्त गावात वाऱ्यासारखं पसरलं आणि एकच खळबळ उडाली.

घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा

मयत कुटुंबाच्या घराबाहेर मोठ्या संख्येने जमाव जमा झाला. पोलिसांचा फौजफाटाही घटनास्थळी दाखल झाला. वरिष्ठ पोलीस अधिकारी शैलेश पांडे यांच्या अंदाजानुसार मालमत्तेच्या वादातून भाच्यानेही ही हत्या केली आहे. आरोपीच्या अटकेसाठी छापेमारी केली जात आहे. जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनीही या प्रकरणी कोणतीही हयगय होणार नाही, अशी ग्वाही दिली. पाच जणांचे मृतदेह पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या :

सोनू…तुझ्यावर कुणाचाच भरोसा नाय, 13 लग्न, 13 मुलांना लुटलं, सोनू शिंदेची टोळी अखेर सापडली!

वर्षभरापूर्वी पतीचं निधन, आता दिराने वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन संपवलं!

(Uttar Pradesh Crime Ayodhya Nephew Killed Five Members of Uncle’s Family)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.