AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही खात असलेल्या भाज्या खरंच ताज्या आहेत का? ‘हा’ व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!

सावधान... सुकलेल्या कुजलेल्या भाज्याही तुम्हाला ताज्या असल्याचं भासवून विकल्या जात आहेत. त्याबाबतचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

तुम्ही खात असलेल्या भाज्या खरंच ताज्या आहेत का? 'हा' व्हिडीओ पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही!
केमिकलचा वापर करुन भाज्या ताज्या करणारा व्हिडीओ व्हायरल
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 9:01 PM
Share

अंबरनाथ : तुम्ही भाज्या खरेदी करण्यासाठी बाजारात जाता. ताज्या, चांगल्या आणि आरोग्यदायी भाज्यांसाठी तुम्ही जास्तीचे पैसे मोजायलाही तयार असता. मात्र, सावधान… सुकलेल्या कुजलेल्या भाज्याही तुम्हाला ताज्या असल्याचं भासवून विकल्या जात आहेत. त्याबाबतचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पूर्णपणे सुकलेल्या भाज्या हिरव्यागार आणि टवटवीत करणारं एक केमिकल वापरलं जात आहे. त्याद्वारे सुकलेल्या भाज्याही ताज्या असल्याचं भासवून तुम्हाला विकल्या जात आहेत. (Dried vegetables fresh by chemical, The Viral video warns the common man)

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे नक्की सांगता येत नाही. मात्र, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. बाजारात गेल्यानंतर हिरव्यागार आणि टवटवीत पालेभाज्या पाहून त्या विकत घेण्याचा मोह कुणालाही आवरत नाही. आपल्या रोजच्या जेवणात पालेभाज्यांचा समावेश असावा, असं डॉक्टर देखील सांगतात. मात्र आपण घरी आलेल्या पालेभाज्या या हिरव्यागार आणि टवटवीत कशा होतात? याचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अगदी सुकलेल्या अवस्थेतील भाज्यांना अवघ्या दोनच मिनिटात टवटवीत करणारं एक रसायन सध्या बाजारात उपलब्ध झालंय.

सुकलेल्या भाज्या 2 मिनिटांत टवटवीत!

या रसायनात भाज्या बुडवल्यानंतर अवघ्या दोनच मिनिटात अगदी टवटवीत दिसू लागतात. याचं प्रात्यक्षिक असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये असणाऱ्या व्यक्ती या मराठीत बोलत असल्याने हा व्हिडिओ महाराष्ट्रातला असल्याचं स्पष्ट होतंय. मात्र हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. व्हिडिओमध्ये असलेल्या व्यक्तींनी सुकलेल्या भाज्या हिरव्यागार करण्याचं जे प्रात्यक्षिक दाखवलंय, ते खरोखरच धक्कादायक आहे.

अगदी सुकलेल्या अवस्थेतील या तीन प्रकारच्या भाज्या समोर ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी एका कोथिंबिरीची जुडी या व्यक्तींनी आधी साध्य पाण्यात बुडवून बाजूला ठेवली. पाण्यात बुडवलेल्या कोथिंबिरीच्या जूडीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही. त्यानंतर एका भांड्यात असलेल्या रसायनामध्ये कोथिंबीर आणि दुसरी एक पालेभाजी बुडवून ती देखील बाजूला ठेवली. यावेळी अवघ्या दोनच मिनिटात रसायनात बुडवलेल्या भाज्यांनी आपलं रूप पालटायला सुरुवात केली. दोनच मिनिटात या भाज्या अगदी ताज्या आणि टवटवीत भासू लागल्या. बाजूलाच पाण्यात बुडवून ठेवलेली कोथिंबिरीची जुडी मात्र जशीच्या तशीच होती. यानंतर ती जुडी देखील या व्यक्तींनी याच केमिकलमध्ये बुडवली आणि त्या कोथींबीरीच्या जुडीतही लक्षणीय बदल झाला. सुकलेली आणि अक्षरशः काळी पडलेली कोथिंबीरीची जुडी काही मिनिटातच हिरवीगार आणि टवटवीत झाली.

व्हिडिओत दाखवण्यात आलेलं केमिकल आहे की एखादं औषध, हे जरी स्पष्ट झालेलं नसलं, तरी ते नागरिकांच्या आरोग्याला हानीकारण ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपण बाजारातून आणलेली हिरवी भाजी ही नक्की शेतात पिकली आहे? की एखाद्या केमिकलच्या पातेल्यात हे तपासून घेणं गरजेचं बनलं आहे.

इतर बातम्या :

Raj Kundra case : राज कुंद्रांच्या बँक खात्यात रोज लाखो रुपयांचं डिपॉझिट! आकडेवारी जाणून तुम्हीही हैराण व्हाल

Benefits Of Grapeseed Oil : त्वचा उजळवायचीय?, मग द्राक्षांच्या बियांचं तेल वापराच!

Dried vegetables fresh by chemical, The Viral video warns the common man

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.