AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनायक मेटेंच्या औरंगाबादेतील बैठकीत गोंधळ, एक लाखांची चेन लंपास, नऊ जणांवर गुन्हे

बैठकीत झालेल्या गदारोळामुळे विनायक मेटे यांना बैठकीतून बाहेर पडावं लागलं होतं. या गदारोळानंतर मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला होता.

विनायक मेटेंच्या औरंगाबादेतील बैठकीत गोंधळ, एक लाखांची चेन लंपास, नऊ जणांवर गुन्हे
विनायक मेटे, नेते, शिवसंग्राम
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 26, 2021 | 11:51 AM
Share

औरंगाबाद : शिवसंग्रामचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांना शिवीगाळ करणाऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. औरंगाबादेत शिवसंग्रमाच्या बैठकीत गोंधळ घातल्याप्रकरणी नऊ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. विनायक मेटे यांच्या पडेगाव येथील बैठकीत शिवीगाळ करत आरोपी अंगावर धावून गेल्याचा आरोप आहे. आरोपींपैकी एकाने गळ्यातील एक लाख रुपयांची चेन लंपास केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. औरंगाबादमध्ये होणारा संघर्ष मेळावा उधळून लावण्याचा राज्य सरकारचा कट असल्याचा संशय मेटेंनी व्यक्त केला आहे. (Vinayak Mete Shivsangram meeting ruckus at Aurangabad 9 booked).

विनायक मेटे काय म्हणाले होते?

बैठकीत झालेल्या गदारोळामुळे विनायक मेटे यांना बैठकीतून बाहेर पडावं लागलं होतं. या गदारोळानंतर मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला होता. “शिवसंग्रामच्या बैठकीत गोंधळ घालणाऱ्या गावगुंडांची आम्ही तक्रार केली आहे. या गावगुंडांना अटक नाही झाली तर परवाच्या मेळाव्यात आम्ही निर्णय घेऊ. ही सरकारची गुंडगिरी आहे. आम्ही सहन करणार नाहीत. स्वस्थ बसणार नाहीत. आम्ही गप्प आहोत याचा अर्थ आम्ही बांगड्या भरल्या असा होत नाही” अशा शब्दात मेटे यांनी रोष व्यक्त केला होता.

नेमकं काय घडलं?

औरंगाबाद येथील पडेगाव येथे 24 जून रोजी शिवसंग्रामची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे हे देखील उपस्थित होते. शिवसंग्रामच्या मेळाव्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र बैठक सुरु असताना अचानक तिथे काही जण दाखल झाले. त्यांनी प्रचंड गोंधळ घालत बैठक बंद पाडली. भाजपचे सरकार असताना प्रश्न का सोडवला नाही? असा प्रश्न विचारत त्यांनी बैठकीत गोंधळ घातला. या गोंधळावरुन विनायक मेटे यांनी नंतर पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली.

मेटे यांचा पोलिसांवरही आरोप

“बीडचा मोर्चा काढल्यानंतर पोलिसांचं वर्तन बदललं आहे. मला 25 वर्षे झालं संरक्षण आहे, पण मी मुंबईतून बाहेर पडलो की माझं संरक्षण काढून घेण्यात येत आहे. याबाबत मी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिलं आहे”, असं विनायक मेटे म्हणाले.

संबंधित बातमी : 

औरंगाबादेत शिवसंग्रामच्या बैठकीत राडा, शिवसैनिकांनी विनायक मेटेंची बैठक बंद पाडली

‘आम्ही गप्प याचा अर्थ हातात बांगड्या भरल्या नाहीत’, शिवसैनिकांनी सभा उधळल्यानंतर विनायक मेटे आक्रमक

(Vinayak Mete Shivsangram meeting ruckus at Aurangabad 9 booked)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली