AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसुती दरम्यान रक्तस्रावाने महिलेचा मृत्यू,हलगर्जीने मृत्यू झाल्याचा पतीचा आरोप

मनोर ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान अति रक्तस्त्राव झाल्याने पालघर तालुक्यातील धुकटन गावातील २२ वर्षीय प्रिती जाधव हिचा सिल्वासा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्रसुती दरम्यान रक्तस्रावाने महिलेचा मृत्यू,हलगर्जीने मृत्यू झाल्याचा पतीचा आरोप
| Updated on: Oct 07, 2025 | 4:20 PM
Share

प्रसुती दरम्यान गर्भाशयाच्या पिशवीचा काही भाग बाहेर आल्याने रक्तस्राव सुरु झाल्याने पालघर येथील २२ वर्षीय महिलेला पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे हलवण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने या महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. या महिलेला सिल्वासा येथील रुग्णालयात हलवण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने तोपर्यंत रक्तस्रावाने या महिलेचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

मनोर ग्रामीण रुग्णालयात प्रसूती दरम्यान अति रक्तस्त्राव झाल्याने पालघर तालुक्यातील धुकटन गावातील २२ वर्षीय महिलेला ( प्रिती जाधव ) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिल्वासा येथे हलवण्यात आले होते. त्यानंतर शासकीय रुग्णालयात उपचारा दरम्यान प्रिती जाधव यांचा मृत्यू झाला आहे. प्रसूती दरम्यान या महिलेच्या गर्भाशयाच्या पिशवीचा काही भाग बाहेर आल्याने युटेरियन इन्व्हर्जनमुळे रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्यानंतर या महिलेला तातडीने सिल्वासा येथे हलवण्यात आले. परंतू येथे गेल्यानंतर अतिरक्तस्राव झाल्याने या महिलेचा मृत्यू झाला.

डॉक्टरांवर हलगर्जीचा आरोप

या प्रकरणात प्रसुतीनंतर उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप या महिलेचे पती राहुल जाधव यांनी केला आहे. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सिल्वासा येथील रुग्णालयात पोहोचण्यासाठी उशीर झाल्याने आपल्या पत्नीचा मृत्यू झाला असे सांगत कारवाईची मागणी राहुल जाधव यांनी केली आहे. मयत प्रिती जाधव यांना प्रसूती वेदना सुरु झाल्याने रविवारी मनोरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्रावामुळे प्रकृती गंभीर झाल्याचे आणि वेळेत रुग्णवाहिका मिळाली नसल्याने आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेचे पती राहुल जाधव यांनी केला आहे.

उपचारादरम्यान मृत्यू

प्रसूती दरम्यान पिशवीचा काही भाग बाहेर आल्याने युटेरिय इन्व्हर्जनमुळे रक्तस्त्राव सुरु झाला होता. त्यामुळे पुढील स्त्रीरोग तज्ञांनी महिलेला उपचारासाठी सिल्वासा येथे पाठवण्याचा निर्णय घेतला होता. महिलेला डॉक्टरांसह सिल्वासा येथे पाठवण्यात आले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले परंतु सिल्वासा येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृत्यूच्या घटनेची वरिष्ठ स्तरावरून चौकशी केली जाईल असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक