AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरोपींच्या चौकशीतून 20 गुन्ह्यांची उकल, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

सोनसाखळी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या चोरांनी लॉकडाऊनच्या काळात शहरात धुमाकुळ घातला होता.

सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; आरोपींच्या चौकशीतून 20 गुन्ह्यांची उकल, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त
| Updated on: Nov 20, 2020 | 5:20 PM
Share

नवी मुंबई : सोनसाखळी चोरणाऱ्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या चोरांनी लॉकडाऊनच्या काळात शहरात धुमाकुळ घातला होता. सखोल तपास केल्यानंतर या पाच जणांना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. विषेश म्हणजे त्यांच्या अटकेमुळे इतर वीस गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली आहे. (chain snatcher gang arrested in Navi Mumbai, 20 lakh rupees seized)

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांत नवी मुंबई परिसरात चोनसाखळ्या चोरण्याचे प्रमाण बरेच वाढले होते. सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावरुन जाताना चोरट्यांकडून सोनसाखळ्या पळवल्याच्या तक्रारीही येत होत्या. विशेषत: लॉकडाऊनच्या काळात हा प्रकार बऱ्याच प्रमाणात वाढला होता. सोनसाखळी चोरांचा हा वाढता धुमाकाळ लक्षात घेऊन पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी त्यांचा बंदोबस्त करण्यावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आयुक्तांच्या निर्देशानुसार स्थानिक पोलिसांनी आपला तपास सुरु केला.

चोरांना पकडण्यासाठी झारखंड, ओडिसा पोलिसांची मदत

तपास केल्यानंतर पाच सोनसाखळी चोरांचा पोलिसांना सुगावा लागला. त्यापैकी आरोपी तन्वीर उर्फ दीपक आणि त्याचा एक साथीदार ट्रेनमध्ये प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या गुप्त सूत्रांकडून समजली. त्यांतर झारखंड आणि ओडिसा पोलिसांच्या मदतीने नवी मुंबई पोलिसांनी या दोन्ही आरोपींना धावत्या ट्रेनमधून पकडले. तसेच इतर आरोपींना पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.

सध्या पाचही आरोप नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून पाचही जणांची कसून चौकशी सुरु आहे. या आरोपींच्या चौकशीदरम्यान नवी मुंबईतील इतर एकूण वीस गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच आरोपींकडून पोलिसांनी 20 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बीपीनकुमार सिंह यांनी दिली.

दरम्यान, चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे नवी मुंबई परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातवरण होतं. दिवसाढवळ्या चोरीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र, आता या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. (chain snatcher gang arrested in Navi Mumbai, 20 lakh rupees seized)

संबंधित बातम्या :

विरारमध्ये जबरी चोरीचा 6 दिवसात छडा, 4 कोटीची रोकड घेऊन पळालेले चोरटे पकडले

दीड वर्षांपासून लपाछपीचा खेळ, नागपूर पोलिसांनी वाँटेड आरोपीच्या मुसक्या आवळल्या, 20 लाखांचं चोरी केलेलं सोनं जप्त

चोरीस गेलेले दागिने आठ वर्षानंतर मिळाले, आर्थिक अडचण असताना पोलिसांची मोठी कामगिरी

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.