AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सर्व परीक्षा आता ऑफलाईनच, 12वी मेरीटबाबतही मोठा निर्णय

बारावीच्या परीक्षेबाबतही उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली. शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि निकाल लवकर लावावेत अशा सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सर्व परीक्षा आता ऑफलाईनच, 12वी मेरीटबाबतही मोठा निर्णय
CUET PG 2022Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 28, 2022 | 9:13 AM
Share

मुंबई : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन (Exam Offline) होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी परीक्षांबाबत शुक्रवारी मोठं विधान केलं आहे. कोरोनाचं संकट आता निवळलंय. त्यामुळे विद्यापीठाांच्या परीक्षा यापुढे ऑफलाईनच घेण्यात येणार आहेत, असं उदय सामंत यांनी म्हटलंय. कोरोनामध्ये सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं झाल्या. शिक्षणही ऑनलाईनच सुरु होतं. दरम्यान, आता शाळा आणि कॉलेज पूर्ण क्षमतेनं सुरु झालेत. त्यानंतरही काही विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली होती. आता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार नसल्यानं विद्यार्थ्यांना (Student Exam) ऑफलाईन परीक्षेला सामोरं जावं लागमार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना वेळ अपुरी पडू नये, यासाठी काही परीक्षांसाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. परीक्षेआधी प्रश्नपत्रिकाही देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र अखेरीस आता सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन होतील, असं उदय सामंत यांनी म्हटलंय.

ऑफलाईनच…

वेगवेगळ्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑफलाईन घेऊ नयेत, यासाठी आंदोलन केलं होतं. निदर्शनं देखील करण्यात आली होती. सुरुवातील या विद्यार्थ्यांची मागणी ग्राह्य धरत काही प्रमाणात ऑनलाईन सवलही परीक्षांमध्ये देण्यात आलेली. दरम्यान, आता सर्वच गोष्टी पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानं परीक्षादेखील ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

निकाल लवकर लागणार..

बारावीच्या परीक्षेबाबतही उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली. शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि निकाल लवकर लावावेत अशा सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बारावीचे विद्यार्थी हे अनेकदा सीईटी परीक्षेच्या स्पर्धेत बारावीच्या मुख्य अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करतात असंही निदर्शनास आलं आहे. याचा विचार करुन पुढच्या वर्षीपासून मेरटीसाठी बारावी आणि सीईटी असे प्रत्येकी पन्नास टकेक गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनीही असा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मेरीटसाठी हीच पद्धत ग्राह्य धरली जाणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 सप्टेंबरपासून करण्याचा प्रयत्न असल्याचीही माहिती उदय सामंत यांनी दिली. त्याचप्रमाणे अनेक कॉलेजमध्ये मराठीतून अभ्यासक्रम सुरु करण्यात आलेला आहे. इंजिनिअरींगच्या मराठी अभ्यासक्रमाला विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहितीदेखील उदय सामंत यांनी दिली आहे.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.