AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव कसं शोधणार?

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे घेण्यात येत आहे.

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव कसं शोधणार?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 28, 2021 | 12:25 PM
Share

मुंबई : अकरावी प्रवेशाची FYJC (11th) पहिली गुणवत्ता यादी 27 ऑगस्टला जाहीर झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे घेण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची आकडेवारी जाहीर केली आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतील मुंबई, अमरावती, नागपूर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांमधील पात्र विद्यार्थी आणि महाविद्यालय अलॉट करण्यात आलेली संख्या शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

अमरावती विभाग

अमरावती विभागाची प्रवेश क्षमता 11339 इतकी असून त्यापैकी 7 हजार 408 विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले होते. पहिल्या यादीत 5533 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आलं आहे.

मुंबई विभाग

मुंबई महानगर विकास प्राधिकरणात येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशाची क्षमता 1 लाख 97 हजार 171 इतकी असून त्यासाठी 1 लाख 91 हजार 093 विद्यार्थ्यांनी नोदंणी केली होती. त्यापैकी 1 लाख 17 हजार 883 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत महाविद्यालय अलॉट करण्यात आलं आहे.

नागपूर

राज्याची राजधानी नागपूर विभागातील प्रवेशाची क्षमता 42 हजार 883 असून त्यासाठी 17 हजार 944 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते, त्यापैकी 14 हजार 245 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आलं आहे.

नाशिक

अकरावी प्रवेशसाठी नाशिक जिल्ह्यातील प्रवेश क्षमता 20 हजार 921 इतकी आहे. तर, 16 हजार 208 विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी 11 हजार 850 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आलेलं आहे.

पुणे

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याची अकरावी प्रवेशाची क्षमता 86 हजार 482 आहे. त्यासाठी 56 हजार 767 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. तर, 38 हजार 858 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट करण्यात आलं आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

महाविद्यालय अलॉट झालं का कसं तपासायचं?

स्टेप 1 : अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम https://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी.

स्टेप 2: नोंदणीवेळी मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा

स्टेप 3 : लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवेशाचा तपशील पाहायला मिळेल

स्टेप 4 : वेबसाईटवरील चेक अलॉटमेंट स्टेटस वर क्लिक करा

स्टेप 5 : तुम्हाला महाविद्यालय अलॉट झालं असेल तर त्याचं ना तुम्हाला स्क्रिनवर पाहायला मिळेल

30 ऑगस्टपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा

शालेय शिक्षण विभागानं तयार केलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशा विद्यार्थ्यांचं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी अभिनंदन केलं आहे. पहिल्या गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांनी 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावेत, असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं केली जाते.

इतर बातम्या:

अकरावी प्रवेशाचं टेन्शन दूर, शिक्षण विभागाकडून मोबाईल ॲपची निर्मिती, वर्षा गायकवाड यांच्याकडून घोषणा

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा जाहीर, ‘या’ दिवशी परीक्षेला सुरुवात, वर्षा गायकवाड यांची माहिती

Maharashtra Education Minister Varsha Gaikwad announced first merit list details of FYJC Admission

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.