AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता 35% नाही, इंग्रजी विषयात पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त… टक्क्यांची आवश्यकता, वाचा सविस्तर

केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ (CBSE) तर्फे बारावीच्या परीक्षेला १५ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरुवात झाली होती. १४ मार्चला होळीची सुट्टी असून १५ मार्चला हिंदी परीक्षा आहे. परीक्षेचा शेवटचा पेपर ४ एप्रिलला होईल.

आता 35% नाही, इंग्रजी विषयात पास होण्यासाठी विद्यार्थ्यांना फक्त... टक्क्यांची आवश्यकता, वाचा सविस्तर
विद्यार्थी
| Edited By: | Updated on: Mar 12, 2025 | 10:28 AM
Share

सीबीएसई बोर्डतर्फे आज, ११ मार्च २०२५ रोजी बारावी वर्गाची परीक्षा आयोजित केली जात आहे. परीक्षेला सुरुवात झाली आहे. ही परीक्षा दुपारी १ वाजून ३० मिनिटांपर्यंत चालणार आहे. पेपर संपल्यानंतर, परीक्षार्थ्यांकडून विश्लेषण समोर येऊ शकेल. त्यांना पेपर कसा वाटला, याची माहिती मिळू शकेल

केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ (CBSE) तर्फे बारावीच्या परीक्षांना १५ फेब्रुवारी २०२५ पासून सुरुवात झाली होती. त्याच क्रमाने आज इंग्रजी विषयाचा पेपर घेतला जात आहे. त्यानंतर, बोर्डतर्फे पुढच्या दिवशी म्हणजेच १२ मार्च २०२५ रोजी योग आणि फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी ट्रेनर विषयाची परीक्षा घेतली जाईल. १३ मार्च २०२५ रोजी वेब अप्लिकेशनचा पेपर होईल आणि त्यानंतर १४ मार्च २०२५ रोजी होळीची सुट्टी दिली जाईल. त्यानंतर, १५ मार्च २०२५ रोजी हिंदी विषयाची परीक्षा होईल. पुढे, १७ मार्च २०२५ रोजी उर्दू इलेक्टिव्ह, उर्दू कोर, कथक नृत्य, फ्रंट ऑफिस ऑपरेशन यांसारख्या इतर विषयांचे पेपर घेतले जातील. बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डतर्फे शेवटचा पेपर ०४ एप्रिल २०२५ रोजी आयोजित केला जाईल.

परीक्षेत कोणकोणते विषय असतील ?

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, कायद्याचे अध्ययन, रिटेल, शारीरिक शिक्षण, अन्न उत्पादन, टायपोग्राफी आणि संगणक अनुप्रयोग, व्यवसाय अध्ययन, व्यवसाय प्रशासन, भूगोल, फ्रेंच, वस्त्रविज्ञान, कृषीशास्त्र, विपणन यासह इतर विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या गेल्या आहेत.

सीबीएसई बोर्डने जाहीर केलेल्या मार्किंग योजनेनुसार, इंग्रजी परीक्षेत पास होण्यासाठी परीक्षार्थ्यांना एकूण 33 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यानंतरच ते परीक्षेत यशस्वी ठरू शकतील.सीबीएसई बोर्डच्या वतीने पुढील वर्षापासून दहावीच्या वर्गासाठी वर्षातून दोन वेळा परीक्षा आयोजित केल्या जातील. याअंतर्गत, पहिल्या टप्प्याची परीक्षा फेब्रुवारीमध्ये आणि दुसऱ्या टप्प्याची परीक्षा मे महिन्यात घेतली जाईल. परीक्षेत मिळालेल्या सर्वोत्तम गुणांना ग्राह्य धरले जाईल. यासंबंधी अधिकृत माहिती बोर्डच्या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी इच्छुक पालक किंवा विद्यार्थी पोर्टलवर तपशील पाहू शकतात.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....