AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly Election 2022 : दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं; गोव्यात विक्रमी मतदान, उत्तर प्रदेश, उत्तराखंडची स्थिती काय?

तीनही राज्यातील संध्याकाळी 5 पर्यंतच्या आकडेवारीनुसार गोव्यात विक्रमी 75 टक्के मतदान पार पडली. तर उत्तर प्रदेशात संध्याकाळी 5 पर्यंत 60.44, तर उत्तराखंडमध्ये 59.37 टक्के मतदानाची नोंद झाली. तर संपूर्ण आकडेवारी थोड्याच वेळात येण्याची शक्यता आहे.

Assembly Election 2022 : दुसऱ्या टप्प्यातील मतदान संपलं; गोव्यात विक्रमी मतदान, उत्तर प्रदेश, उत्तराखंडची स्थिती काय?
| Updated on: Feb 14, 2022 | 8:16 PM
Share

मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2022) दुसऱ्या टप्प्यात आज गोवा (Goa), उत्तराखंड (Uttarakhand) आणि उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) प्रदेशात मतदान पार पडलं. गोवा आणि उत्तराखंडसाठी एकाच टप्प्यात निवडणूक पार पडली. तर उत्तर प्रदेशात दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान झालं. तीनही राज्यातील संध्याकाळी 5 पर्यंतच्या आकडेवारीनुसार गोव्यात विक्रमी 75 टक्के मतदान पार पडली. तर उत्तर प्रदेशात संध्याकाळी 5 पर्यंत 60.44, तर उत्तराखंडमध्ये 59.37 टक्के मतदानाची नोंद झाली. तर संपूर्ण आकडेवारी थोड्याच वेळात येण्याची शक्यता आहे.

सोमवारी पार पडलेल्या मतदानात तीनही राज्यात मिळून विधानसभेच्या 165 जागांसाठी 1 हजार 519 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं. उत्तर प्रदेशाात दुसऱ्या टप्प्यात एकूण 9 जिल्ह्यात मतदान झालं. त्यात बिजनौर, सहारनपूर, अमरोहा, संभल, मुरादाबाद, रामपूर, बरेली, बदायूं आणि शाहजहांपूर या जागांचा समावेश आहे. या 9 जिल्ह्यातील विधानसभेच्या 55 जागांसाठी मतदान पार पडलं. यात 2 कोटी 2 लाख मतदारांनी सहभाग नोंदवला.

तर उत्तराखंडमधील सर्व 70 जागांसाठी सोमवारी मतदान पार पडलं. उत्तराखंडमधील 82 लाख पेक्षा अधिक मतदारांनी 632 उमेदवारांचं भविष्य ईव्हीएममध्ये कैद केलं आहे. त्याचबरोबर गोव्यातील सर्व 40 जागांसाठीही आज मतदान झालं. या जागांसाठी एकूण 301 उमेदवार रिंगणात होते. गोव्यात भाजप, काँग्रेससह आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, शिवसेना-राष्ट्रवादी आणि अन्य छोट्या पक्षांनीही नशीब आजमावलं.

गोव्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

गोव्यात प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री प्रमोद सावंत (भाजप), विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (काँग्रेस), माजी मुख्यमंत्री चर्चिल अलेमाओ (टीएमसी), रवी नाईक (भाजप), लक्ष्मीकांत पार्सेकर (अपक्ष), माजी उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई (जीएफपी), सुदीन ढवळीकर (एमजीपी), माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर आणि आपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अमित पालेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करत गोव्याचा निवडणुकीत उडी घेतली आहे. तर अरवींद केजरीवाल यांची आम आदमी पार्टीने स्वबळावर निवडणूक लढवली आहे.

इतर बातम्या :

अमित शाह म्हणाले, ‘ना घर का ना घाट का’, आता हरीश रावत यांचं ‘जरुरत पडी तो काटुंगा भी’ म्हणत जोरदार प्रत्युत्तर

Hijabनंतर आता आणखी एक Video Viral; यूझर्स म्हणतायत, जग जातंय पुढे भारत मात्र चाललाय मागे!

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.