AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बड्या पक्षाचा कॉंग्रेसला टाटा, बाय बाय…, इंडिया आघाडीला पहिला जोर का झटका

लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर इंडिया आघाडीतील एका बड्या पक्षाने काँग्रेससोबत असलेली आघाडी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे केंद्रात सत्ता स्थापनेची तयारी करत असलेल्या इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का बसला आहे. निकालानंतर तिसऱ्याच दिवशी इंडिया आघाडातील एक पक्ष फुटला आहे.

बड्या पक्षाचा कॉंग्रेसला टाटा, बाय बाय..., इंडिया आघाडीला पहिला जोर का झटका
RAHUL GANDHI AND ARVIND KEJRIWALImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jun 06, 2024 | 8:45 PM
Share

लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीमध्ये आम आदमी पक्षाचा समावेश करण्यात आला होता. दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांवर भाजपविरोधात लढण्यासाठी पक्षाने काँग्रेससोबत युती केली. दिल्लीच्या सात जागांपैकी आम आदमी पक्षाने चार तर काँग्रेसने तीन जागा लढविल्या होत्या. मात्र, येथील सातही जागांवर भाजप उमेदवार निवडून आले. या मोठ्या अपयशानंतर लोकसभा निवडणुक निकालाच्या तिसऱ्याच दिवशी ‘आप’ने काँग्रेसला टाटा, बाय बाय करत एकट्यानेच पुढे जाण्याची घोषणा केली. आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर या निर्णयाची जाहीर घोषणा केली.

दिल्लीतील सातही जागांवर झालेल्या पराभवानंतर आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री अर्विनाद केजरीवाल यांच्या घरी पक्षाचे आमदार, पदाधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पक्षांचे ज्येष्ठ नेते गोपाल राय यांनी आपल्या पक्षाने विधानसभा निवडणूक एकट्याने लढवण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.

काँग्रेससोबतची युती ही केवळ लोकसभा निवडणुकीसाठी होती. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक पक्ष स्वबळावर लढवणार आहे. लोकसभा निवडणूक आम्ही प्रामाणिकपणे एकत्र लढलो. पण, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आमची युती नाही. दिल्लीच्या जनतेसोबत मिळून आम्ही ही लढाई लढू आणि जिंकू. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून हे स्पष्ट झाले आहे की लोकसभा निवडणुकीसाठी भारत आघाडीची स्थापना झाली होती. त्यामुळे आम्ही एकत्र लढलो. जोपर्यंत विधानसभा निवडणुकीचा प्रश्न आहे. यासाठी कोणतीही युती झालेली नाही. आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार आहे, असे ते म्हणाले.

केजरीवाल यांनी आधीच संकेत दिले होते

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 2 जूनपर्यंत कोर्टाने जामीन दिला होता. पण, पुन्हा तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवाल यांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेससोबतची मैत्री भविष्यात संपुष्टात येऊ शकते, असे संकेत दिले होते. काँग्रेससोबत आमचा कोणताही कायमचा विवाह नाही. आमचे लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेजही नाही. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आपला पक्ष महाआघाडीत सामील झाला होता असे ते म्हणाले होते.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष