AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रनौत यांची पहिली प्रतिक्रिया

Kangna Ranaut | मंडीमध्ये कंगना रनौत यांचा डंका... विजयी घोषित झाल्यानंतर अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया... कंगना रनौत यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीतच विजय मिळवला आहे... जोरदार प्रचार केल्यानंतर मंडीच्या जनतेनं कंगना यांना केलं विजयी..

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रनौत यांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: Jun 04, 2024 | 3:34 PM
Share

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीतच विजय मिळवला आहे. भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. मंडी मतदार संघात कंगना यांच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह होते. कंगना रनौत यांनी मंडी लोकसभा जागेवर जोरदार प्रचार केला आणि विजय मिळवला. अभिनेत्रीची ही पहिलीच निवडणूक असून कंगनाने पहिली निवडणूक जिंकली आहे.

पहिल्यांदा निवडूण आल्यामुळे कंगना यांनी पंतप्रधान मोदी आणि जनतेचे आभार मानले आहेत. कंगना म्हणाल्या, ‘आमचे नेता नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडणूक लढवली आहे. मोदी यांच्यावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार आहे. तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला हवे आहेत. मंडीचं भाविष्य आता उज्वल असणार आहे…. असं म्हणत कंगना यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकल्यानंतर भावना व्यक्त केल्या आहेत.’

सांगायचं झालं तर, कंगना यांनी विक्रमादित्य सिंह यांच्यावर 73 हजार मतांनी मात केली आहे. कंगना रनौत यांना 503790 जनतेनं मत दिलं. विक्रमादित्य सिंह यांना 430534 मतं मिळाली आहेत. कंगना यांच्या विजयानंतर मंडी मतदार संघात आनंदाचं वातावरण आहे.

सोशल मीडियावर कंगना यांनी आईसोबत काही फोटो पोस्ट केले आहे. फोटोंमध्ये कंगना आईचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, कंगना यांनी आता स्वतःचा मोर्चा राजकारणाकडे वळवळा आहे. सध्या सर्वत्र कंगन यांच्या विजयाच्या चर्चा रंगल्या आहे.

आता बॉलिवूडला निरोप देणार कंगना रनौत?

कंगना रनौत यांच्या विजयानंतर अभिनेत्री बॉलिवूड सोडणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण निवडणूक प्रचारादरम्यान कंगना यांनी निवडणूक जिंकली तर बॉलिवूड सोडेन, असं वक्तव्य केलं होते. आता कंगना रनौत यांची पुढील वाटचाल आणि घोषणा काय असेल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा