AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निकालापूर्वीच मोदी आणि भाजपची कुंडली तयार; काशीच्या ज्योतिषांचा आकडा काय?

येत्या 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्या आधीच एक्झिट पोल आले आहेत. सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे भाजपच्या तंबूत आनंदाचं वातावरण आहे. तर विरोधी पक्षांमध्ये बैचेनी वाढली आहे. एक्झिट पोलच्या आकड्यानंतर आता काशीच्या ज्योतिषांनीही आपला आकडा सांगितला आहे. भाजप, मोदी आणि इंडिया आघाडीची कुंडलीही तयार केली आहे.

निकालापूर्वीच मोदी आणि भाजपची कुंडली तयार; काशीच्या ज्योतिषांचा आकडा काय?
rahul gandhiImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 02, 2024 | 9:18 PM
Share

एक्झिट पोलचा कल हाती आल्यानंतर आता 4 जून रोजी निकाल काय असेल अशी देशभर चर्चा सुरू झाली आहे. कारण अनेकदा एक्झिट पोल जवळपास खरे ठरले आहेत. तर अनेकदा एक्झिट पोलच्या उलट निर्णय आलेला आहे. त्यामुळे एनडीएला तिसऱ्यांदा प्रचंड बहुमत मिळणार का? असा सवाल केला जात आहे. नरेंद्र मोदीही तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार का? अशी चर्चाही या निमित्ताने रंगली आहे. इंडिया आणि एनडीए आघाडीला या निवडणुकीत किती जागा मिळणार आहे याची उत्सुकताही लोकांना लागली आहे. काशीच्या पंडितांनीही या बाबतचा एक रिपोर्ट तयार केला आहे. त्यांच्या रिपोर्टमध्ये काही धक्कादायक विश्लेषण देण्यात आलं आहे.

काशीचे पंडित संजय उपाध्याय यांनी इंडिया आघाडी, बीजेपी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुंडली तयार केली आहे. उपाध्याय यांच्या चार पिढ्या ज्योतिष शास्त्राचा अभ्यासक आहेत. देशातील सर्व टप्प्यांचे मतदान झाले आहे. त्यानंतर लग्न आणि राशीचं विश्लेषण करून संजय उपाध्याय यांनी इंडिया आघाडी, भाजप आघाडी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुंडली तयार केली आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

दोन तृतियांश बहुमत

इंडिया आघाडीची वृश्चिक लग्न कुंडली आहे. मोदी यांचीही वृश्चिक लग्न कुंडली आहे. तर भाजपची मिथुन लग्न कुंडली आहे. राशींबाबत बोलायचं झालं तर मोदी आणि भाजपची राशी वृश्चिक आहे. तर इंडिया आघाडीची राशी कर्क आहे. राशी आणि लग्नाच्या आधारे विश्लेषण केलं असता भाजपची कुंडली इंडिया आघाडीपेक्षा अधिक तेज आहे. 4 जून रोजी येणाऱ्या निकालाच्या आधारावर अधिक प्रभावी होताना दिसत आहे. कुंडलींच्या अभ्यासावर नजर टाकली तर लग्न आणि राशींनी प्रभावित असलेला भाजप दोन तृतियांश बहुमत मिळवेल. त्यानुसार भाजपला 360 ते 375 जागा मिळण्याची शक्यता आहे, असं उपाध्याय म्हणाले.

4 जूनकडे लक्ष

सातव्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर वेगवेगळे एक्झिट पोल आहेत. त्यानुसार या निवडणुकीतही भाजपला मोठं यश मिळताना दिसत आहे. त्यावरून आता चर्चा सुरू झाली आहे. एक्झिट पोल आपल्या फेव्हरमध्ये आल्याने भाजपमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र, इंडिया आघाडीला हे एक्झिट पोल माान्य नाहीयेत. त्यामुळे देशाची नजर 4 जूनकडे लागलं आहे. 4 जून रोजी प्रत्यक्ष मतमोजणीनंतर काय निकाल येतो याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.