AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्या निघायचंय, तातडीने बॅगा भरा… नाना पटोले यांच्या सर्व खासदारांना सूचना

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षाच्या सर्वच खासदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विधानसभेतही असंच यश मिळवण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं. तसेच काही जागा आपल्याला मिळाल्या असत्या तर आजचं चित्र आणखी वेगळं असतं, असंही नाना पटोले म्हणाले.

उद्या निघायचंय, तातडीने बॅगा भरा... नाना पटोले यांच्या सर्व खासदारांना सूचना
नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 07, 2024 | 7:58 PM
Share

उद्या संध्याकाळी 6.30 वाजता दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये महत्त्वाची मिटिंग आहे. त्यामुळे उद्या सगळ्यांना दिल्लीला यायचं आहे. विशाल पाटील काल दिल्लीला जाऊन आले. तुम्हालाही निघायचं आहे. बॅगा भरून ठेवा, अशा सूचना देतानाच मात्र, ही बॅग कपड्यांची असावी, एकनाथ शिंदे यांच्या बॅगेसारखी नको, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला. राज्यातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांशी संवाद साधत असताना त्यांनी या सूचना केल्या आहेत.

आपल्या सर्वच्या सर्व 14 खासदारांचं मी अभिनंदन करतो. ज्यांनी ज्यांनी खासदार निवडून आणण्यात मदत केली त्यांचे आभार. सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे देखील आभार व्यक्त करतो. महाराष्ट्रातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा विजय आहे. महाराष्ट्रच्या जनतेचं देखील मी आभार व्यक्त करतो. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली. त्यामुळे ही निवडणूक घराघरात पोहोचली. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष उभा राहिला, असं नाना पटोले म्हणाले.

सर्व श्रेय राहुल गांधींना

आज देशाचं संविधान बदलण्याच काम सुरू होतं. ते आपण थांबवलं आहे. महाराष्ट्रातील जनतेने जो कौल दिला, त्यातून भाजपला सबक मिळाला आहे. ही लोकांची निवडणूक होती. या वेळेस सगळे काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले. सामूहिक विजयाचा हा उत्सव आहे. या सर्वांचं श्रेय राहुल गांधींना जातं, असंही ते पटोले म्हणाले.

खूप भयानक परिस्थिती

आज राज्यात दुष्काळ आहे. काँग्रेसने लगेच एक समिती स्थापन केली. आम्ही राज्यभर फिरून आढावा घेत आहोत. सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. पण या सरकारला कशाचंही पडलेलं नाही. राज्यात खूप भयानक परिस्थिती आहे, असं त्यांनी सांगितलं.

पंजा दिसला पाहिजे

या अडचणीच्या परिस्थितीत काँग्रेसने ही लढाई हिमतीने लढली. या विश्वासाला तडा आम्ही जाऊ देणार नाही. अमोल कीर्तिकर जिथे उभे होते, ती जागा आपली होती. वर्षा गायकवाड यांचीही जागा काढून घेतली. या दोन्ही जागा आम्हाला दिल्या असत्या तर महाविकास आघाडीचा फायदा झाला असता. पण हा लढा अजून संपलेला नाही. आपल्याला आता सुरुवात करायची आहे. ताकतीने विधानसभेला उतरायचं आहे. आता काँग्रेसचा पंजा सगळीकडे दिसला पाहिजे, असं आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं.

Follow Us
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.