AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi : ते आधी हळूहळू बुडत होते, आता वेगाने बुडणार ; मोदींचा रोख कुणाकडे ?

2014, 2019 आणि 2024 मधील काँग्रेसच्या तीन निवडणुकीतील जागा एकत्र केल्या तर त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलो आहोत. ते आधी हळूहळू बुडत होते. आता वेगाने बुडणार आहेत, असा टोला मोदींनी लागवला.

Narendra Modi : ते आधी हळूहळू बुडत होते, आता वेगाने बुडणार ; मोदींचा रोख कुणाकडे ?
| Updated on: Jun 07, 2024 | 2:25 PM
Share

इंडिया आघाडीचे लोक आधुनिकतेच्या आणि तंत्रज्ञानाच्या विरोधातील आहेत. ते जगात भारताची लोकशाही कमी लेखण्याचं काम करत आहेत. भारत ही लोकशाहीची जननी असल्याचं मी जगभरात सांगतोय आणि हे तिकडे लोकशाही बदनाम करायचं काम करत आहेत. हा चहावाला गडबड करून आलाय असं सांगत आहेत, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. 2014, 2019 आणि 2024 मधील काँग्रेसच्या तीन निवडणुकीतील जागा एकत्र केल्या तर त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलो आहोत. ते आधी हळूहळू बुडत होते. आता वेगाने बुडणार आहेत, असा टोला मोदींनी लागवला. आज नरेंद्र मोदी यांची सर्वमताने एनडीएच्या नेतेपदी निवड झाली.

1 तारखेला मतदान झाला. 4 तारखेला काऊंटिंग झालं. त्यातील महत्त्वाच्या गोष्टी पाहा. या काळात देशात हिंसा घडवण्याची भाषा केली जात होती. काही लोक गंभीरतेने घेत नाहीत. निकाल आल्यावर देशात आग लागेल अशा पद्धतीने काम केलं. देशातील लोकांना विभागण्याचं काम केलं. लोकांना तोडण्याचं काम केलं. देशात फूट पाडण्याचं काम केलं, असा आरोप मोदी यांनी केला.

पराजित लोकांचा उपहास करण्याची आपली संस्कृती नाही

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर हे निकाल एनडीएचा महाविजय आहे, हेच लोक सांगतील. जगही हे मान्य करेल. पण आम्ही हरलोय, गेलोय अशा पद्धतीने दोन दिवस सुरू होतं. त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांचं मॉरल हाय करायचं होतं. काल्पनिक गोष्टी सांगाव्या लागल्या. आघाडीच्या इतिहासात आकडे पाहता हे सर्वात मजबूत आघाडी सरकार आहे. पण प्रयत्न असा केला की विजयच स्वीकारायचा नाही. पराजायत ठेवायचा. अशा गोष्टींचा बालमृत्यू होतो, झाला. पण देशाला माहीत आहे. आम्ही हरलो नव्हतो आणि हरलो नाही. पण 4 तारखेला जी वागणूक राहिली आहे. आपण विजय पचवू शकतो हे आपण दाखवून दिलं. आपले संस्कार असे आहेत. विजयाच्या उन्माद करू नये, पराजित लोकांचा उपहास करण्याची आपली संस्कृती नाही. आपण विजय पचवतो. हे आपले संस्कार आहेत, असे मोदी म्हणाले.

हे तर लहान मूलंही सांगेल

लोकसभेपूर्वी सरकार कुणाचं होतं. 2024 निकालानंतर कुणाचं सरकार बनलं तर लहान मूलही सांगेल एनडीएचं सरकार होतं. मग हारलो कसं? असा सवाल मोदींनी विचारला. पूर्वीही एनडीए होती आणि आताही आहे. दहा वर्षानंतरही काँग्रेसला १००चा आकडा गाठता आला नाही. 2014, 2019 आणि 2024 मधील काँग्रेसच्या तीन निवडणुकीतील जागा एकत्र केल्या तर त्यापेक्षा जास्त जागा आम्ही जिंकलो आहोत. ते आधी हळूहळू बुडत होते. आता वेगाने बुडणार आहेत, असा टोला मोदींनी लगावला.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.