AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा; निकालाआधीच उडवली खळबळ

गांजा कोण पित होतं हे सर्वांना माहीत आहे. निकाल आमच्या बाजूनं लागल्यावर कळेल संन्यास कोण घेणार? रवी राणा यांच्या बोलण्याला काही महत्त्व देण्याची गरज नाही. EVM वर बारकाईने आमचं लक्ष आहे. अंतिम निकाल येईपर्यंत आमचे एजंट बाहेर यायचं नाहीत. सी - 17 फॅार्मची टॅली करुन घेऊन मतमोजणीला सुरुवात करण्याच्या आमच्या सूचना आहेत, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.

विजय वडेट्टीवार यांची मोठी घोषणा; निकालाआधीच उडवली खळबळ
विजय वडेट्टीवारImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 03, 2024 | 8:16 PM
Share

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागायला अजून काही तास उरले आहेत. देशाचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे. भाजप येणार की काँग्रेसचं कमबॅक होणार? याचीच सर्वांना उत्सुकता लागली आहे. तर आपलं काय होणार? अशी धाकधूक अनेक उमेदवारांच्या मनात निर्माण झाली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजामुळे तर काही उमेदवारांची झोपच उडाली आहे. अशी सर्व धाकधूक सुरू असतानाच काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणनेने एकच खळबळ उडाली आहे.

विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आमचा पराभव होत असेल तर मी राजकीय संन्यास घेईल, अशी घोषणाच विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विदर्भच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशात महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद होता. काँग्रेसचं वारं वाहत होतं. महाराष्ट्रातील किमान 35 जागा आम्ही जिंकत आहोत, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

मोदींविरोधात चीड

गेल्या आठवड्यापासून अनेक प्रसार माध्यमं सत्ताधाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत. एक्झिट पोलमध्ये एनडीएचे 350 ते 375 जागा दाखवत आहेत. पण देशात मोदी सरकार विरोधात चीड होती. नागरिकांमध्ये मोठी नाराजी आणि संताप होता. त्यामुळेच मतदारांनी यंदा काँग्रेसला साथ दिली आहे. म्हणूनच आणच्या जागा अधिक निवडून येतील, असं वडेट्टीवार म्हणाले.

त्यांच्यावर कारवाई केली का?

उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली. पण निवडणूक आचारसंहिता असताना धार्मिक भाषणं करणाऱ्यांवर कारवाई झाली का? महाराष्ट्रात मतदान सुरू असताना बाजूच्या मतदारसंघात सभा घेतल्या, तो आचारसंहितेचा भंग झाला नाही का? त्यावर काही कारवाई केली का?, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

तर दाल में कुछ काला है

देशाच्या सत्ता परिवर्तनासाठी काही तास शिल्लक बाकी आहेत. महाराष्ट्राचा निकाल स्पष्ट आहे. आम्ही 35 जागा जिंकत आहोत. एक्झिट पोल बोगस होते. सत्ताधाऱ्यांना खूश करण्यासाठीचे ते एक्झिट पोल आहेत. विदर्भात तर आमची लाट आहे. विदर्भातील 10 पैकी 10 जागा आम्ही जिंकत आहोत. विदर्भातील जनतेने सरकार विरोधात चिडून मतदान केलं आहे. सरकार विरोधात एवढं वातावरण असताना जर निकाल वेगळे लागले तर दाल में कुछ काला है असं समजावं, असं ते म्हणाले. इंडिया आघाडी देशात 295 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला