AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Up Election results 2022 : जिथं शेतकऱ्यांवर भाजपच्या मंत्र्यांच्या पोरानं गाडी घातली तिथं नेमकं कोण जिंकलं?

आजच्या निकालात पाच पैकी चार राज्यात भाजप नेत्यांचा बोलबालो राहिला आहे. अशातच उत्तर प्रदेशात ज्या लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri Election result) भाजप मंत्र्यांच्या मुलाने जिथे शेतकऱ्यांवर गाडी चढवली होती,त्या जागेचं काय झालं? तिथे कोण निवडूण आलं? हा सवाल सर्वांच्या मनात होता.

Up Election results 2022 : जिथं शेतकऱ्यांवर भाजपच्या मंत्र्यांच्या पोरानं गाडी घातली तिथं नेमकं कोण जिंकलं?
मंत्रिपुत्र आशिष मिश्रा पुन्हा तुरुंगातImage Credit source: tv9
| Updated on: Mar 10, 2022 | 6:31 PM
Share

उत्तर प्रदेश : आजच्या निवडणूक निकालात उत्तर प्रदेशात (Up election result 2022) भाजपने पुन्हा बाजी मारली आहे. योगींनी (Yogi Adtityanath) जोमाने खिंड लढवत गड राखला आहे. आजच्या निकालात पाच पैकी चार राज्यात भाजप नेत्यांचा बोलबालो राहिला आहे. अशातच उत्तर प्रदेशात ज्या लखीमपूर खेरीमध्ये (Lakhimpur Kheri Election result) भाजप मंत्र्यांच्या मुलाने जिथे शेतकऱ्यांवर गाडी चढवली होती,त्या जागेचं काय झालं? तिथे कोण निवडूण आलं? हा सवाल सर्वांच्या मनात होता. उतर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात विधानसभेच्या ८ जागांपैकी सर्व जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. येथील जागांमध्ये पालिया, निघासन, गोला गोरखनाथ, श्रीनगर, धौरहरा, लखीमपूर, कास्ता आणि मोहम्मदी यांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात 23फेब्रुवारीला मतदान झाले. लखीमपूर खेरी येथील टिकुनिया हिंसाचारानंतर वातावरण बदलले होते. या हिंसाचारात 8 जणांचा मृत्यू झाला होता.

भाजपने सर्व जागा जिंकल्या

चौथ्या टप्प्यातील मतदानात लखीमपूर खेरीमध्ये 62टक्के मतदान झाले. लखीमपूर खेरीमध्ये मागच्या वेळी भाजपने बाजी मारली होती. त्यानंतर शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली.  अशा स्थितीत शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या या घटनेनंतर भाजपचा मार्ग सोपा नाही, असे सर्वांना वाटत होते.  येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र भाजपने या ठिकाणी बाजी मारली आहे. इथल्या दहाच्या दहा जागा भाजपने जिकल्या आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपे वर्चस्व प्राप्त झाले आहे.

शेतकरी आंदोलनादरम्यानची घटना

गेल्या दोन वर्षात अनेक मोठ्या घडामोडी या जिल्ह्यात घडल्या आहेत. याठिकाणी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यावेळी भाजपचे मंत्री अजय टेनी मित्रा यांचा मुलगा आशिष मित्रा याने आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांवर गाडी चढवली होती. यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका झाली होही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचं काय होणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. केंद्राने पास केले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यासाठी वर्षभरापेक्षाही जास्त काळ शेतकरी आंदोलन दिल्लीच्या सीमेवर चाललं. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांची माफी मागत तिन्ही कृषी कायदे मागे घेतले. मात्र या दिर्घकाळ चाललेल्या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांचा जीव गेला आहे.

Punjab Election Result 2022 : आधी दिल्लीत इन्कलाब, आज पंजाबमध्ये, उद्या देशभर होणार; केजरीवालांच्या विजयी प्रेस कॉन्फरन्समधील मोठे मुद्दे

TV9 Explainer : देवभूमी उत्तराखंडात राजकारणाचं काही खरं नाही, 12 महिन्यात भाजपला चौथ्यांदा मुख्यमंत्री शोधावा लागणार!

Keshav Prasad Maurya : यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा आघाडी पिछाडीचा खेळ, सर्वांचीच धाकधूक वाढली

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.