AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी कोणत्या चित्रपटापासून सुरू झाली माहितीये? आजही या चित्रपटाचे गाणी सुपरहीट

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही जोडी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी आहे. तसेच पडद्यावरही या जोडीला तेवढीच पसंती मिळाली होती.पण हे अनेकांना माहित नसेल की या अभिषेक आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी कोणत्या चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली होती.

अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी कोणत्या चित्रपटापासून सुरू झाली माहितीये? आजही या चित्रपटाचे गाणी सुपरहीट
Abhishek and Aishwarya's love storyImage Credit source: Instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Oct 15, 2025 | 7:03 PM
Share

बॉलिवूडचा अभिनेता अभिषेक बच्चन सध्या चर्चत आहे ते त्याला मिळालेल्या फिल्मफेअर पुरस्कारामुळे. कारण 25 वर्षांच्या मेहनतीनंतर अभिषेकला हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्याने ऐश्वर्यासाठी केलेल्या भावनिक विधानामुळे देखील चर्चा होताना दिसत आहे. तसेच त्यावर ऐश्वर्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या दोघांमधी हे प्रेम चाहत्यांसाठी देखील सुखावणारा क्षण होता.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी 

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित जोडप्यांपैकी एक मानले जातात. गेल्या काही काळापासून या जोडप्यात काही मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्यावर दोघांनीही कधी प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तसेच सध्याच्या त्यांच्या या पोस्टमुळे दोघांमधील प्रेम अजूनही बहरलेलंच आहे असं दिसून येतं.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायची जोडी पडद्यावर देखील तेवढीच रोमँटीक आणि परिपूर्ण दिसली. त्यांनी एकत्र बरेच चित्रपट केले. पण हे फार जणांना माहित असेल की या जोडीची खरी प्रेमकहाणी कोणत्या चित्रपटापासून सुरु झाली ते.

अभिषेक आणि ऐश्वर्याची जोडी पहिल्यांदा कोणत्या चित्रपटात दिसली?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही जोडी पहिल्यांदा 2000 मध्ये एकत्र दिसली होती आणि तेव्हापासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे ढाई अक्षर प्रेम के. या रोमँटिक ड्राम्यात ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली. “ढाई अक्षर प्रेम के” मधील ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनची जोडी चांगलीच गाजली.

त्यानंतर कुछ ना कहो हा 2003 मध्ये आलेला त्यांचा दुसरा चित्रपट. हा चित्रपट हलक्याफुलक्या कथेसह रोमँटिक आहे.

अभिषेक आणि ऐश्वर्याची जोडी दिसली ते 2006 मध्ये आलेल्या उमराव जान या चित्रपटात. हा चित्रपट 1981 च्या क्लासिक चित्रपटाचा रिमेक आहे. ऐश्वर्याने चित्रपटात एका वेश्याची भूमिका साकारली आहे. तर अभिषेकने तिच्या प्रियकराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हीट झाला नसला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ऐश्वर्या- अभिषेक 2006 मध्येच आलेल्या धूम 2 मध्ये देखील एकत्र दिसले.

या चित्रपटाच्या सेटवर फुलली दोघांची लव्हस्टोरी 

पण त्यांची खरी प्रेमकहाणी फुलली ती 2007 मध्ये आलेल्या ‘गुरु’ चित्रपटाच्या सेटवर. याआधीच्या चित्रपटांमध्ये काम करताना ते फक्त चांगले मित्र होते. त्यावेळी, ऐश्वर्या तेव्हा सलमान खानला डेट करत होती असं म्हटलं जातं. गुरु चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या आणि अभिषेकची प्रेम फुललं.हा चित्रपट प्रेक्षकांच्याही खूप पसंतीस उतरला.आजही या चित्रपटातील गाणी हीट आहेत. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांचे जोडीदार बनले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...