AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी कोणत्या चित्रपटापासून सुरू झाली माहितीये? आजही या चित्रपटाचे गाणी सुपरहीट

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही जोडी बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी आहे. तसेच पडद्यावरही या जोडीला तेवढीच पसंती मिळाली होती.पण हे अनेकांना माहित नसेल की या अभिषेक आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी कोणत्या चित्रपटाच्या सेटवर सुरु झाली होती.

अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी कोणत्या चित्रपटापासून सुरू झाली माहितीये? आजही या चित्रपटाचे गाणी सुपरहीट
Abhishek and Aishwarya's love storyImage Credit source: Instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Oct 15, 2025 | 7:03 PM
Share

बॉलिवूडचा अभिनेता अभिषेक बच्चन सध्या चर्चत आहे ते त्याला मिळालेल्या फिल्मफेअर पुरस्कारामुळे. कारण 25 वर्षांच्या मेहनतीनंतर अभिषेकला हा पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्याने ऐश्वर्यासाठी केलेल्या भावनिक विधानामुळे देखील चर्चा होताना दिसत आहे. तसेच त्यावर ऐश्वर्याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्या दोघांमधी हे प्रेम चाहत्यांसाठी देखील सुखावणारा क्षण होता.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी 

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठित जोडप्यांपैकी एक मानले जातात. गेल्या काही काळापासून या जोडप्यात काही मतभेद असल्याच्या बातम्या येत होत्या. पण त्यावर दोघांनीही कधी प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तसेच सध्याच्या त्यांच्या या पोस्टमुळे दोघांमधील प्रेम अजूनही बहरलेलंच आहे असं दिसून येतं.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायची जोडी पडद्यावर देखील तेवढीच रोमँटीक आणि परिपूर्ण दिसली. त्यांनी एकत्र बरेच चित्रपट केले. पण हे फार जणांना माहित असेल की या जोडीची खरी प्रेमकहाणी कोणत्या चित्रपटापासून सुरु झाली ते.

अभिषेक आणि ऐश्वर्याची जोडी पहिल्यांदा कोणत्या चित्रपटात दिसली?

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय ही जोडी पहिल्यांदा 2000 मध्ये एकत्र दिसली होती आणि तेव्हापासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे ढाई अक्षर प्रेम के. या रोमँटिक ड्राम्यात ही जोडी पहिल्यांदाच एकत्र आली. “ढाई अक्षर प्रेम के” मधील ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनची जोडी चांगलीच गाजली.

त्यानंतर कुछ ना कहो हा 2003 मध्ये आलेला त्यांचा दुसरा चित्रपट. हा चित्रपट हलक्याफुलक्या कथेसह रोमँटिक आहे.

अभिषेक आणि ऐश्वर्याची जोडी दिसली ते 2006 मध्ये आलेल्या उमराव जान या चित्रपटात. हा चित्रपट 1981 च्या क्लासिक चित्रपटाचा रिमेक आहे. ऐश्वर्याने चित्रपटात एका वेश्याची भूमिका साकारली आहे. तर अभिषेकने तिच्या प्रियकराची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट हीट झाला नसला तरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ऐश्वर्या- अभिषेक 2006 मध्येच आलेल्या धूम 2 मध्ये देखील एकत्र दिसले.

या चित्रपटाच्या सेटवर फुलली दोघांची लव्हस्टोरी 

पण त्यांची खरी प्रेमकहाणी फुलली ती 2007 मध्ये आलेल्या ‘गुरु’ चित्रपटाच्या सेटवर. याआधीच्या चित्रपटांमध्ये काम करताना ते फक्त चांगले मित्र होते. त्यावेळी, ऐश्वर्या तेव्हा सलमान खानला डेट करत होती असं म्हटलं जातं. गुरु चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या आणि अभिषेकची प्रेम फुललं.हा चित्रपट प्रेक्षकांच्याही खूप पसंतीस उतरला.आजही या चित्रपटातील गाणी हीट आहेत. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांचे जोडीदार बनले.

Follow Us
बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील?
Uday Samant | बंडखोरी मिटवण्यासाठी महायुतीचे प्रयत्न; गोकुळ गीते पाठिंबा देतील, उदय सामंतांचा विश्वास
तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत
Pune | तलवारींचा धाक, कारची तोडफोड; राजगड परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
Sunil Tatkare | दुर्बीण घेऊन स्वतःचं अस्तित्व शोधा! तटकरेंचा विनायक राऊतांवर घणाघात
महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना देसाईंचं प्रत्युत्तर
Shambhuraj Desai | विधान परिषद निवडणूक: महायुतीकडून पैशांचं वाटप केल्याच्या आरोपांना शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर, हवेतल्या गप्पा नको....
रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
Jalgaon Banana Loss | रावेरमध्ये गारपिटीचा कहर! वादळी वाऱ्याने केळीबागा जमीनदोस्त
महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या.....
Chhatrapati Sambhajinagar | महागाईच्या काळात रिक्षाचालकांना मोठा दिलासा! ऑटो LPG तब्बल एवढ्या रुपयांनी स्वस्त, आकडा जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा
कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले.....
Sanjay Raut UNCUT | कोकण ते पुणे... माघारीसाठी कोट्यवधींचे व्यवहार? राऊतांनी उघड केले धक्कादायक दावे
तर मी राजकारणातून संन्यास घेईन; मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
Bal Mane | तर मी राजकारणातून संन्यास घेईन; बाळ मानेंच्या वक्तव्याने ठाकरे गटात खळबळ
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?