AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चन कुटुंबात वाद? ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांनी जया आणि अमिताभ बच्चन यांना..

ऐश्वर्या राय हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आलीये.

बच्चन कुटुंबात वाद? ऐश्वर्या राय आणि अभिषेक यांनी जया आणि अमिताभ बच्चन यांना..
Aishwarya Rai
| Updated on: Jun 07, 2024 | 11:19 AM
Share

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा 51 वाढदिवस 3 जून रोजी झाला. दरवेळी अमिताभ बच्चन हे लग्नाच्या वाढदिवसाला खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मात्र, यंदा त्यांनी कोणतीही पोस्ट शेअर केली नाही. हेच नाही तर नेहमी लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी पार्टी ठेवली जाते. मात्र, यावेळी अशाप्रकारची कोणती पार्टी झाली नसल्याचे देखील काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी अनेक कलाकारांनी त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शुभेच्छा देखील दिल्या.

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाचा वाढदिवस असतानाही अभिषेक बच्चन याने सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची पोस्ट शेअर केली नाही. दरवेळी अभिषेक बच्चन सोशल मीडियावर पोस्ट करत आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. मात्र, यावेळी अभिषेक बच्चन याने पोस्ट शेअर केली नसल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

दुसरीकडे ऐश्वर्या राय ही अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाला पोस्ट शेअर करून त्यांना शुभेच्छा देते. 2018 मध्ये ऐश्वर्या राय हिने अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि आराध्या बच्चन यांचा सुंदर फोटो शेअर करत जया आणि अमिताभ बच्चन यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर तिने पोस्ट शेअर केली नाही. सोशल मीडियावर ऐश्वर्या राय ही अभिषेकला सोडून बच्चन कुटुंबियांपैकी कोणालाही फॉलो करत नाही.

ऐश्वर्या राय तिच्या कुटुंबियांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. फक्त बच्चन कुटुंबियांपैकी कोणाचे फोटो ऐश्वर्या राय शेअर करत नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि बच्चन कुटुंबियांमध्ये वाद सुरू असल्याचेही सांगितले जाते. हेच नाही तर जया बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात वाद सुरू असल्याचे सांगितले जातंय.

गेल्या काही दिवसांपासून सतत ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगताना दिसत आहे. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. हेच नाही तर मध्यंतरी चर्चा होती की, ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याचे घर देखील सोडले आहे. बच्चन कुटुंबात खरोखरच काही वाद सुरू आहे का? असा प्रश्न आता चाहत्यांकडूनही उपस्थित केला जातोय.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.