AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Bachchan : ॲक्टिंग नव्हे, बिग बींच्या मुलाला निवडायचं होतं हे करिअर, अभिषेकने अचानक का बदलला निर्णय ?

Abhishek Bachchan Career : आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन बॉलिवूडमध्ये आलेल्या अनेकांवर नेपो किड्स म्हणून टीका होते. एक चांगला अभिनेता असूनही अभिषेकला अनेकदा आई-वडिलांमुळेच ओळखलं जातं. पण त्याला कधीच अभिनेता व्हायचं नव्हतं, अभिषेकने करिअर म्हणून वेगळ्या मार्गाची निवड केली होती. पण...

Abhishek Bachchan : ॲक्टिंग नव्हे, बिग बींच्या मुलाला निवडायचं होतं हे करिअर, अभिषेकने अचानक का बदलला निर्णय ?
अभिषेक बच्चनImage Credit source: social media
| Updated on: Feb 05, 2026 | 10:03 AM
Share

Abhishek Bachchan Birthday Special : झगमगाटी विश्व म्हणून बॉलिवूड नेहमी प्रसिद्ध असतं. इथलं अनेकांना आकर्षणही वाटत. पण बॉलीवूडमध्ये स्टारकिड असणं हे नेहमीच सोपं असतं असं नाही. नेपोकिड्सना एंट्री सहज मिळ शकते, पण टिकून राहता की नाही हे तुमच्यावरच अवलंबून असतं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन (Abhisheck Bachchan), त्याचं आयुष्य बाहेरून ग्लॅमरस वाटत असले तरी तेही संघर्ष आणि कठीण निर्णयांनी भरलेलं आहे. बच्चन खानदानाचं नाव घेऊन, आई-वडिलांच्या पवालावर पाऊल टाकून अभिषेकने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला खरा पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की अभिषेकने लहानपणापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले नव्हतं. चित्रपटांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी, त्याला एक यशस्वी व्यावसायिक बनायचे होते आणि कॉर्पोरेट जगात स्वतःचे नाव कमवायचे होतं. तेच त्याचं स्वप्न होतं.

5 फेब्रुवारी 1976 साली मुंबईत अभिषेकचा जन्म झाला. शहेनशाह अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांचा तो धाकटा मुलगा आहे. चित्रपट कुटुंबात जन्माला येऊनही अभिषेकचे संगोपन सामान्य आणि शिस्तबद्ध वातावरणात झालं. प्राथमिक शिक्षण झाल्यावर त्याला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवण्यात आलें, जिथे त्याने बिझनेस मॅनैजमेंटचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. मल्टीनेशनल कंपनीमध्ये काम करण्याचं आणि एक यशस्वी कॉर्पोरेट व्यावसायिक बनण्याचं अभिषेकचं स्वप्न होतं.

या कारणामुळे सोडला अभ्यास

मात्र परदेशात असतानाही अभिषेकने त्याच्याावडिलांच्या आयुष्यातील कठीम काल पाहिले, तेव्हा ते आर्थिक संघर्ष करत होते, करिअरचाही बॅज पॅच सुरू होता. वडिलांना इतक्या अडचणींशी झुंजताना पाहून अभिषेकचं मन बदलू लागलं, मपरिवर्तन झालं. कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि परिस्थितीमुळे आपला मार्गही सिनेमाच (चित्रपटसृष्टी) आहे का याचा विचार करण्यास त्याला भाग पडलं. त्याच दरम्यान त्याने शिक्षण अरअधवट सोडलं आणि तो भारतात परत आला.

बॉलिवूडमध्ये पदार्पण

अखेर 2000 साली अभिषेक बच्चनने जे.पी. दत्ता यांच्या “रिफ्यूजी” या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही, परंतु अभिषेकच्या साधेपणाने आणि पडद्यावरच्या उपस्थितीने प्रेक्षकांचे लक्ष नक्कीच वेधून घेतले. मात्र नंतर त्याच्या करिअरचा सुरूवातीचा काळ खूपच संघर्षाचा होता. त्याचे अनेक चित्रपच लागोपाठ फ्लॉप झाले आणि स्टारकिड असूनही तो अपयशी ठरल्याची टीका झाली. वडील अमिताभ बच्चन यांच्याशी केली जाणारी तुलना, हे त्याच्यासाठी सर्वात मोठे आव्हान बनले.

पण काळ पुढे सरकत गेला तसं अभिषेकने त्याचं नाणं खणखणीत वाजतंय हे सिद्ध केलं. ‘युवा’, ‘बंटी और बबली’, ‘धूम’ फ्रेंचाइजी, ‘गुरु’ आणि ‘दिल्ली-6’ सारख्या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. विशेषतः “गुरु” चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं, समीक्षक आणि प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. आज, अभिषेक बच्चन केवळ एक अभिनेताच नाही तर एक जाणकार गुंतवणूकदार आणि बिझनेस माइंडेड पर्सनालिटीदेखील आहे.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.