AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे सोपं नव्हतं..; ऐश्वर्याबद्दल बोलताना अभिषेक सर्वांसमोर भावूक, डोळ्यांत अश्रू; नेमकं काय घडलं?

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अभिषेक बच्चनने पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला. या पुरस्कार स्वीकारताना तो भावूक झाला. मंचावर भावना व्यक्त करताना त्याने पत्नी ऐश्वर्याचे विशेष आभार मानले.

हे सोपं नव्हतं..; ऐश्वर्याबद्दल बोलताना अभिषेक सर्वांसमोर भावूक, डोळ्यांत अश्रू; नेमकं काय घडलं?
Aishwarya Rai and Abhishek BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 12, 2025 | 3:13 PM
Share

अभिनेता अभिषेक बच्चनने त्याच्या आतापर्यंतच्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये बऱ्याच उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. परंतु आजवर त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला नव्हता. यावर्षी पहिल्यांदाच त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ‘फिल्मफेअर पुरस्कार’ पटकावला आहे. ‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याने हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. मंचावर पुरस्कार स्वीकारल्यानंतर तो भावूक झाला होता. यावेळी त्याच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याची ट्रॉफी हातात घेतल्यानंतर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

“या फिल्म इंडस्ट्रीत मला 25 वर्षे पूर्ण झाली. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मी काय भाषण देणार, यावर मी कित्येत वेळा सराव केला आहे. सरावाचा आकडाही माझ्या आता लक्षात नाही. माझ्यासाठी हे एक स्वप्न होतं आणि हा पुरस्कार पटकावल्यानंतर मी अत्यंत नम्र आणि भावूक झालो आहे. माझ्या कुटुंबीयांसमोर हा पुरस्कार मिळाल्यामुळे हा क्षण आणखी खास झाला आहे. मला अनेक लोकांचे आभार मानायचे आहेत. गेल्या 25 वर्षांत ज्या दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी माझ्यासोबत काम केलं, माझ्यावर विश्वास ठेवला. हे सोपं नव्हतं”, असं अभिषेक म्हणाला.

मंचावर भावूक झालेल्या अभिनेत्याने त्याची पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या यांचाही उल्लेख केला. “ऐश्वर्या आणि आराध्याला हा पुरस्कार समर्पित करतो. बाहेर जाऊन काम करण्याची आणि माझ्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची परवानगी दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला आशा आहे की हा पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांना ही गोष्ट समजली असेल की त्यांच्या त्यागामुळेच आज मी याठिकाणी उभा आहे. मी हा पुरस्कार दोन अत्यंत खास लोकांना समर्पित करू इच्छितो. हा चित्रपट एक वडील आणि मुलीबद्दल आहे. हा पुरस्कार मी माझ्या हिरोला, माझ्या वडिलांना आणि माझी दुसरी हिरो, माझ्या मुलीला समर्पित करतो. खूप खूप धन्यवाद. माझ्यासाठी हे किती महत्त्वाचं आहे, ते मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही”, अशा शब्दांत त्याने भाषणाचा समारोप केला.

‘आय वाँट टू टॉक’ या चित्रपटात अभिषेक बच्चनने एका आजारी पित्याची भूमिका साकारली आहे. शूजित सरकारने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. यामध्ये जयंत क्रिपलानी आणि अहिल्या बामरू यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत