AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय हिने सोडलं बच्चन कुटुंबाचं घर, पतीकडून घेणार घटस्फोट? जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा

Aishwarya Rai : ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्यामध्ये दुरावा, बॉलिवूडमध्ये होणार आणखी एक घटस्फोट? जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ऐश्वर्या राय - अभिषेक बच्चन यांच्या नात्याची चर्चा...

ऐश्वर्या राय हिने सोडलं बच्चन कुटुंबाचं घर, पतीकडून घेणार घटस्फोट? जवळच्या व्यक्तीकडून मोठा खुलासा
| Updated on: Dec 18, 2023 | 11:46 AM
Share

मुंबई | 18 डिसेंबर 2023 : बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी घटस्फोट घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी देखील जोर धरला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये देखील सध्या फक्त आणि फक्त ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान, अभिषेक याने साखरपुड्याची अंगठी काढल्याची चर्चा देखील तुफान सुरु आहे. पण यावर ऐश्वर्या – अभिषेक यांनी मौन धरलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता, जवळच्या व्यक्तीकडून ऐश्वर्या – अभिषेक यांच्या नात्याबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. ज्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे.

रिपोर्टनुसार, ऐश्वर्या – अभिषेक यांच्या जवळच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या – अभिषेक यांचं नातं सध्या नाजूक वळनावर आहे. ऐश्वर्या राय हिने बच्चन कुटुंबाचं घर म्हणजे ‘जलसा’ सोडली आहे. अभिनेत्री आता आई आणि मुलीसोबत जगत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

ऐश्वर्या राय हिच्या सासूबाई आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमुळे ऐश्वर्या हिने सासर सोडल्याची तुफान चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, दोन वर्षांपासून दोघींनी त्यांच्यामध्ये असलेले वाद आणि मतभेद मिटवण्याचे प्रयत्न देखील केले नाहीत. तर दुसरीकडे, अभिषेक बच्चन मुलगा आणि पती म्हणून स्वतःच्या जबाबदाऱ्या निभावण्यात अपयशी ठरला… अशी माहिती देखील समोर येत आहे. सध्या चर्चेत असलेल्या गोष्टींचा खुलासा झालेला नाही. ऐश्वर्या – अभिषेक यांनी रंगत असलेल्या चर्चांवर अद्याप स्पष्टीकरण दिलेलं नाही.

दरम्यान, ‘द अर्चिज’ सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी देखील संपूर्ण बच्चन कुटुंब एकत्र आलं होतं. तेव्हा देखील ऐश्वर्या हिला पाहून जया बच्चन आणि श्वेता बच्चन नंदा यांनी पाठ फिरवली.. अशा देखील अनेक चर्चा रंगल्या. नुकताच झालेल्या आराध्या हिच्या एनुअल डे कार्यक्रमात अभिषेक – ऐश्वर्या वेगळ्या कारमधून आले. पण आराध्या हिला घेऊन घरी परतत असताना मात्र ऐश्वर्या – अभिषेक लेकीसोबत एकत्र गेले..

ऐश्वर्या – अभिषेक यांचं नातं

सांगायचं झालं तर, गेल्या 16 वर्षांपासून ऐश्वर्या – अभिषेक एकत्र राहात आहेत. अनेक वर्ष ऐश्वर्या – अभिषेक यांनी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. 2007 मध्ये मोठ्या थाटात ऐश्वर्या – अभिषेक यांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.