AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कॅनडा कुमार’च्या टीकेने वैतागला अक्षय कुमार; भारतीय पासपोर्टविषयी म्हणाला..

भारतीय पासपोर्टच्या मुद्द्यावर अखेर अक्षयने सोडलं मौन

'कॅनडा कुमार'च्या टीकेने वैतागला अक्षय कुमार; भारतीय पासपोर्टविषयी म्हणाला..
| Updated on: Nov 13, 2022 | 3:42 PM
Share

मुंबई- अभिनेता अक्षय कुमार त्याच्या नागरिकत्वामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. इतकंच नव्हे तर त्याला सोशल मीडियावर अनेकदा ‘कॅनडा कुमार’ म्हणूनही ट्रोल केलं जातं. तीन वर्षांपूर्वी अक्षय कुमारने सांगितलं होतं की तो लवकरच त्याच्या भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करणार आहे. आता तीन वर्षांनंतर त्याने पासपोर्टविषयी पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला अक्षय?

हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये अक्षय सहभागी झाला होता. या समिटमध्ये त्याने त्याच्या पासपोर्टबद्दल वक्तव्य केलं. अक्षयला पुन्हा एकदा त्याच्या पासपोर्टवरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याने मी इतरांपेक्षा कमी भारतीय ठरत नाही. मी भारतीयच आहे. मी गेल्या नऊ वर्षांपासून इथे आहे, जेव्हा मला पासपोर्ट मिळाला होता. तेव्हा काय घडल, कशामुळे वगैरे त्याबद्दल मला बोलायचं नाही. माझे चित्रपट चांगले चालत नव्हते. होय, मी 2019 मध्ये म्हटलं होतं की मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि नंतर कोरोना महामारी आली. त्यामुळे दोन-अडीच वर्षे सर्व गोष्टी बंद पडल्या.” लवकरच त्याला भारतीय पासपोर्ट मिळणार असल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं.

कॅनडाच्या पासपोर्टबद्दल एका मुलाखतीत अक्षय म्हणाला होता, “काही वर्षांपूर्वी जेव्हा माझे चित्रपट चालत नव्हते, तेव्हा मी दुसरीकडे जाऊन काम करण्याचा विचार केला होता. माझे 14-15 चित्रपट फ्लॉप झाले होते. बरेच लोक तिथे (कॅनडा) कामासाठी जातात, पण तरीही ते भारतीयच आहेत. इथे जर नियतीने माझी साथ दिली नाही तर तिथे जाऊन काम करण्याचा विचार मी केला होता. मी तिथे गेलो, त्यासाठी नागरिकत्वाचा अर्ज केला आणि मला तो मिळाला.”

कॅनडाचं नागरिकत्व असलं तरी मी भारतातील सर्व कर वेळेवर भरतो. मी या देशाचा आहे आणि नेहमीच भारतीय असेन, असंही अक्षय म्हणाला होता.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.