.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कॅनडा कुमार’च्या टीकेने वैतागला अक्षय कुमार; भारतीय पासपोर्टविषयी म्हणाला..

भारतीय पासपोर्टच्या मुद्द्यावर अखेर अक्षयने सोडलं मौन

'कॅनडा कुमार'च्या टीकेने वैतागला अक्षय कुमार; भारतीय पासपोर्टविषयी म्हणाला..
| Updated on: Nov 13, 2022 | 3:42 PM
Share

मुंबई- अभिनेता अक्षय कुमार त्याच्या नागरिकत्वामुळे अनेकदा चर्चेत आला आहे. इतकंच नव्हे तर त्याला सोशल मीडियावर अनेकदा ‘कॅनडा कुमार’ म्हणूनही ट्रोल केलं जातं. तीन वर्षांपूर्वी अक्षय कुमारने सांगितलं होतं की तो लवकरच त्याच्या भारतीय पासपोर्टसाठी अर्ज करणार आहे. आता तीन वर्षांनंतर त्याने पासपोर्टविषयी पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला अक्षय?

हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये अक्षय सहभागी झाला होता. या समिटमध्ये त्याने त्याच्या पासपोर्टबद्दल वक्तव्य केलं. अक्षयला पुन्हा एकदा त्याच्या पासपोर्टवरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला, “माझ्याकडे कॅनडाचा पासपोर्ट असल्याने मी इतरांपेक्षा कमी भारतीय ठरत नाही. मी भारतीयच आहे. मी गेल्या नऊ वर्षांपासून इथे आहे, जेव्हा मला पासपोर्ट मिळाला होता. तेव्हा काय घडल, कशामुळे वगैरे त्याबद्दल मला बोलायचं नाही. माझे चित्रपट चांगले चालत नव्हते. होय, मी 2019 मध्ये म्हटलं होतं की मी भारतीय पासपोर्टसाठी अर्ज केला होता आणि नंतर कोरोना महामारी आली. त्यामुळे दोन-अडीच वर्षे सर्व गोष्टी बंद पडल्या.” लवकरच त्याला भारतीय पासपोर्ट मिळणार असल्याचंही त्याने यावेळी स्पष्ट केलं.

कॅनडाच्या पासपोर्टबद्दल एका मुलाखतीत अक्षय म्हणाला होता, “काही वर्षांपूर्वी जेव्हा माझे चित्रपट चालत नव्हते, तेव्हा मी दुसरीकडे जाऊन काम करण्याचा विचार केला होता. माझे 14-15 चित्रपट फ्लॉप झाले होते. बरेच लोक तिथे (कॅनडा) कामासाठी जातात, पण तरीही ते भारतीयच आहेत. इथे जर नियतीने माझी साथ दिली नाही तर तिथे जाऊन काम करण्याचा विचार मी केला होता. मी तिथे गेलो, त्यासाठी नागरिकत्वाचा अर्ज केला आणि मला तो मिळाला.”

कॅनडाचं नागरिकत्व असलं तरी मी भारतातील सर्व कर वेळेवर भरतो. मी या देशाचा आहे आणि नेहमीच भारतीय असेन, असंही अक्षय म्हणाला होता.

Follow Us
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात