AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय कुमारच्या मुलाने वयाच्या 15 व्या वर्षी सोडलं घर, पत्नी म्हणाली, ‘माझं घर सोडून गेलास तेव्हा…’

Akshay Kumar Son: 'माझं घर सोडून गेलास तेव्हा...', वयाच्या 15 व्या वर्षी अक्षय कुमारच्या मुलाने सोडलं घर, भावना व्यक्त करत अभिनेत्याची पत्नी म्हणाली, 'माझं घर सोडून गेलास तेव्हा...', सध्या सर्वत्र खिलाडी कुमारच्या मुलाची चर्चा...

अक्षय कुमारच्या मुलाने वयाच्या 15 व्या वर्षी सोडलं घर, पत्नी म्हणाली, 'माझं घर सोडून गेलास तेव्हा...'
| Updated on: Sep 17, 2024 | 1:23 PM
Share

अभिनेता अक्षय कुमार याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्याच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सर्वांना माहिती आहे. पण खिलाडी कुमारच्या खासगी आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. अभिनेत्याच्या मुलाने वयाच्या 15 व्या वर्षी घरी सोडलं आणि स्वतःचं स्वतंत्र आयुष्य जगू लागला… याबद्दल देखील फार कमी लोकांना माहिती आहे. आता अक्षय कुमार याची पत्नी ट्विंकल खन्ना हिने लेकाने घर सोडल्यानंतर मनातील भावना व्यक्त केल्या. मुलाच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर खास पोस्ट करत ट्विंकल खन्ना हिने मनातील भावना व्यक्त केल्या.

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या मुलाचं नाव आरव असं आहे. वयाच्या 15 व्या वर्षी आरव याने आई – वडिलांचं घर सोडलं आहे. सध्या आरव लंडन याठिकाणी असून फॅशन इंडस्ट्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

लेक आरव बद्दल ट्विंकल खन्ना म्हणाली, ‘जेव्हा तू मला सतत म्हणायता तुला जायचं आहे आणि तुला तुझं आयुष्य जगाचं आहे. तेव्हा मला कायम वाटायचं माझं घर सोडून तू जेव्हा स्वतःच्या घरात पाय ठेवशील तेव्हा माझं आयुष्यात अंधकार येईल. त्यानंतर जेव्हा केव्हा तू मला भेटायला येशील तेव्हा दिवे लावून सर्वांना सांगेल, ही टेम्परेरी पॉव्हर कट नाही तर, आम्ही दिवाळी साजरी करत आहोत.’

पुढे ट्विंकल म्हणाली, ‘पण नंतर मला कळंल जो मनात असतो, तो कधीच लांब जात नाही. मग त्या व्यक्तीने देश बदलला तरी काहीही हरकत नाही. माझं जग तुझ्या एका फोन कॉल आणि मेसेजने प्रकाशित होतं. मग ते घाणेरड्या कपड्यांबद्दल असूदे…’ सध्या सर्वत्र ट्विंकलच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

ट्विंकल खन्ना हिच्या पोस्टवर फक्त चाहत्यांनी नाही तर, सेलिब्रिटींनी देखील कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता बॉबी देओल, नम्रता शिरोडकर, हुमा कुरैशी यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी ट्विंकल खन्ना हिच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

मुलाबद्दल काय म्हणाला होता अक्षय कुमार?

अभिनेता म्हणाला, ‘माझा मुलगा आरव लंडन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे. त्याला वाचायला प्रचंड आवडतं. त्याला एकटं राहायला आवडतं. ट्विंकल आणि मी ज्याप्रमाणे आरव याचं पालन-पोषण केलं आहे. त्यावर आम्हाला आनंद आहे. आरव प्रचंड साधा मुलगा आहे. पण माझ्या मुलीला कपडे प्रचंड आवडतात.’ आरवचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.