AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिताभ – जया बच्चन यांच्या नात्यालाही गेला असता तडा? एका अटीमुळे टिकलं नातं, अनेक वर्षांनी मोठं सत्य समोर

Amitabh Bachchan - Jaya Bachchan: फक्त एका अटीमुळे टिकलं आहे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचं लग्न, बिग बींची 'ती' अट मान्य केल्यानंतर जया बच्चन यांनी कारावा लागला मोठा त्याग.. अनेक वर्षांनंतर मोठं सत्य समोर...

अभिताभ - जया बच्चन यांच्या नात्यालाही गेला असता तडा? एका अटीमुळे टिकलं नातं, अनेक वर्षांनी मोठं सत्य समोर
फाईल फोटो
| Updated on: Jul 11, 2025 | 3:58 PM
Share

Amitabh Bachchan – Jaya Bachchan: महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. बच्चन कुटुंब हे बॉलिवूडमधील प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कुटुंबांपैकी आहे. सांगायचं झालं तर, अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 पेक्षा जास्त वर्ष झाली आहे. पण आजही दोघे अनेक ठिकाणी एकत्र आणि आनंदी दिसतात. फक्त एका अटीमुळे जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांचं नातं इतके वर्ष टिकलं असं म्हणायला हरकत नाही. जया बच्चन यांना डेट करत असतानाच बिग बी यांनी एक अट घातली होती. ती अट नक्की कोणती होती जाणून घेऊ…

दोघांच्या स्टारडमबद्दल सांगायचं झालं तर, जया बच्चन प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री असताना बिग बी बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. जया यांच्यामुळे बिग बींना एका सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच सिनेमामुळे बिग बी यशाच्या शिखरावर पोहोचले. 1973 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जंजीर’ सिनेमा जया आणि बिग बी यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली आणि चाहत्यांनी देखील दोघांना डोक्यावर घेतलं.

‘जंजिर’ सिनेमानंतर जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांच्या संख्येत देखील मोठी झाली. त्यानंतर दोघांची जोडी फक्त ऑनस्क्रिन नाही तर, ऑफस्क्रिन देखील हीट ठरली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांनी 3 जून 1973 रोजी लग्न केलं.

अमिताभ बच्चन यांची अट

लग्नाआधी अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्यासमोर एक अट ठेवली होती. लग्नानंतर जया बच्चन फार कमी काम करतील. ठराविक प्रोजेक्टमध्ये आणि चांगल्या लोकांसोबत जया बच्चन काम करतील… अशी अट बिग बी यांनी ठेवली होती आणि जया बच्चन यांनी ती मान्य देखील केली.

लग्नानंतर अमिताभ बच्चन यांनी अनेक हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. पण जया बच्चन मात्र घर आणि मुलांमध्ये व्यस्त झाल्या. आज लग्नाच्या जवळपास 50 वर्षांनंतर देखील जया बच्चन आणि अमिताभ बच्चन मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत. जया बच्चन नुकताच ‘राजा रानी की प्रेम कहानी’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटील आल्या होत्या.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....