AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्ही हे सगळं सोडून गावी का गेलात? अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नावर नाना पाटेकरांचं भन्नाट उत्तर

एकेदिवशी अमिताभ बच्चन यांनी नाना पाटेकरांना विचारलं की, तुम्ही हे सगळं सोडून गावी का गेलात? त्यावर त्यांना काय उत्तर दिलं, याविषयीचा खुलासा नाना पाटेकरांनी नुकत्याच एका कार्यक्रमात केला.

तुम्ही हे सगळं सोडून गावी का गेलात? अमिताभ बच्चन यांच्या प्रश्नावर नाना पाटेकरांचं भन्नाट उत्तर
Nana Patekar and Amitabh BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: May 26, 2025 | 9:08 AM
Share

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर हे अत्यंत साधं आयुष्य जगण्यासाठी ओळखले जातात. शहरातली धावपळ, दगदग त्यांना आवडत नाही. शहरामध्ये श्वास घेता येत नाही, असं ते म्हणतात. नुकत्याच एका कार्यक्रमात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा एक किस्सा सांगितला. हे सगळं सोडून तुम्ही तिथे (गावी) का गेलात, असा प्रश्न बिग बींनी नानांना विचारला होता. त्यावर नानांनी त्यांना काय उत्तर दिलं, हे त्यांनी या कार्यक्रमात संगितलं. माजी आयएएस अधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या सामाजिक कार्यावर ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात नाना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

नाना म्हणाले, “अमिताभ बच्चन त्यादिवशी बोलत होते की हे सगळं सोडून तुम्ही तिथे का गेलात? मी त्यांना म्हटलं की, तुम्ही तिथे या म्हणजे तुम्हाला कळेल की मी हे सगळं का सोडलं? कारण तुम्हाला माहीतच नाही. तुमच्याकडे सगळं आहे, पण काय नाहीये हे तुम्हाला माहीत नाही. कारण जे तुमच्याकडे आहे ते सगळं नाहीये. आम्हाला तिथे नुसता निसर्ग नाही तर माणसंही भेटतात, जनावरंही भेटतात. माझ्याकडे दहा गायी आहेत, बैल आहेत, सहा कुत्री आहेत आणि नुसतं हिरवंगार आहे.”

“मी नुकतीच बोअर घेतली आणि त्याला तीन इंची पाणी लागलं, तेव्हा मी केवढा हरखलो! आता माझा आनंद त्यात आहे, मी नवीन गाडी घेतली त्यात नाही. ज्याला आहे त्याचं चुकतंय अशातला काही भाग नाही. पण मला हे आवडतं. रस्त्यावर कुठे भांडण सुरु असेल तर मी गाडीतून उतरतो आणि त्यांच्याशी बोलतो. मला हे सगळं करावंसं वाटतं. कारण ती मला माझी मुलं वाटतात. मुळात लहानपणी माझी वृत्ती अतिशय वांड होती. होती म्हणजे आहे, ती गेली नाही,” अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

यावेळी नानांनी आणखी एका नटाचा किस्सा सांगितला. “मी आता एका नटासोबत काम करत होतो. त्याने विचारलं, तुम्ही इतके साधे कसे असता? मी म्हटलं साधे कसलं? देवाने इतकं काही दिलेलं आहे. तो म्हणाला, तुमचे कपडे इतके साधे.. मी म्हटलं, हे सर्वांत महाग कपडे आहेत, खादी आहे. याच्यापेक्षा महाग कपडे नाहीत. हे रोज धुवावे लागतात. तुझ्या जीन्ससारखे नाही, महिनाभरानं धुवावं लागणारे”, अशी गंमत त्यांनी केली.

Follow Us
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला.

सणसणीत लगावली…! लॉर्ड्सवरील रोहित शर्माच्या शतकानंतर माजी क्रिकेटपटूने लेखाजोखा मांडला

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी.

Mumbai School Holiday: जमावबंदी लागू केल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी? BMC कडून अधिकृत विधान जारी

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा