AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : मुलासाठी कौतुकाचे पूल बांधता, मग जया-ऐश्वर्यावर प्रेम नाही का ? अमिताभ स्पष्टच बोलले..

Amitabh Bachchan Reaction: बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनी वयाची 80 वर्ष पार केली तरी आजही ते जोमाने काम करताना दिसतात. सोशल मीडियावरही ते बरेच ॲक्टिव्ह असतात. अनेकदा ते त्यांचा मुलगा, अभिनेता अभिषेक बच्चन याचं कौतुक करताना दिसतात. पण पत्नी जया बच्चन आणि सूनबाई ऐश्वर्या यांचं सोशल मीडियावर कौतुक का करत नाहीत, याचं कारण त्यांनी नुकतंच सांगितलं.

Amitabh Bachchan : मुलासाठी कौतुकाचे पूल बांधता, मग जया-ऐश्वर्यावर प्रेम नाही का ? अमिताभ स्पष्टच बोलले..
बच्चन कुटुंबImage Credit source: social media
| Updated on: Jun 24, 2025 | 10:19 AM
Share

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन हे आजची प्रचंड वेगाने काम करतात आणि त्यासोबतच ते सोशल मीडियावरही सक्रिय असतात. X वर तसेच इतर प्लॅटफॉर्वरही ते बऱ्याचदा पोस्ट टाकत असतात.फेसबूरवरही ते त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही अपडेट्स देतात. हेच बिग बी अनेकदा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन यांचे सार्वजनिक ठिकाणी कौतुक करतात. पण ते त्यांची पत्नी जया बच्चन तसेच सूनबाई ऐश्वर्या यांचं समाजमाध्यमांवर कधीच कौतुक का करत नाहीत असा सवाल विचारत एका यूजरने त्याना ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. त्यावर बिग बी यांनी थेट उत्तर दिलं, सध्या सगळीकडे त्याचीच चर्चा सुरू आहे.

शहेनशाह नावानेही ओळखल्या जाणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनला त्यांच्या ‘कालिधर लपता’ या नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा देऊन त्याचे कौतुक केले होते. पण त्यावर एका सोशल मीडिया युजरने अमिताभ बच्चन यांना सवाल विचारला. मुलासाठी तुम्ही कौतुकाचे पूल बांधता मग पत्नी जया बच्चन आणि सून ऐश्वर्या राय यांचे कौतुक का करत नाहीत? अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक नवीन फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ते त्यांच्या घराबाहेर चाहत्यांचे स्वागत करताना दिसत आहेत. या पोस्टवर त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, ‘हो, मी अभिषेकची प्रशंसा करतो, मग?’

काय म्हणाले बिग बी?

त्याच पोस्टवर एका यूजरने त्यांना सवाल विचारला, ‘ मग तुम्ही तुमच्या मुलीचे, सूनचे, पत्नीचेही असेच कौतुक करायला हवे.’. यावर अमिताभ बच्चन यांनी अतिशय सभ्य शब्दांत उत्तर दिलं. ‘हो, मी त्यांची प्रशंसा करतो… माझ्या मनात… सार्वजनिकरित्या नाही… महिलांचा आदर करणे महत्त्वाचे आहे.’ असं बिग बी यांनी लिहीलं.

याच पोस्टवर, जेव्हा एका युजरने त्यांच्या चाहत्यांना ‘पेड फॅन्स’ म्हटले, तेव्हा अमिताभ बच्चन यांनीही क्षणाचाही विलंब न करता योग्य उत्तर दिले. त्यांनी लिहिले, ‘सिद्ध करा! तुम्ही संकुचित मनाचे आहात… स्वतः पैसे देऊन तुमचे चाहते खरेदी करा.’ तर दुसऱ्या यूजरने अभिषेक बच्चनला ‘कुटुंबातील सर्वात जबाबदार आणि प्रौढ व्यक्ती’ असं संबोधले, त्यावरही अमिताभ यांनी उत्तर दिले, ‘त्याच्याकडे सर्वांसाठी प्रेम, आदर, प्रतिष्ठा आणि काळजी आहे.’ मात्र त्याच वेळी, जेव्हा एका व्यक्तीने जलसाच्या बाहेर उभ्या असलेल्या चाहत्यांना ‘बेरोजगार’ म्हटले तेव्हा अमिताभ बच्चन यांनी हसून उत्तर दिले, ‘मग त्यांना नोकऱ्या द्या? जेव्हा ते जलसाच्या बाहेर उभे असतात तेव्हा ते प्रेमात मग्न असतात.’

तर आणखी एका यूजपने त्यांना विचारला, या जगात, प्रत्येकजण त्याच्या हिश्शाच घेऊन जन्माला आला आहे. अभिषेक त्याच्या हिश्शाचं, तुम्ही तुमच्या हिश्शाचं आणि हरिवंश राय त्यांच्या हिश्शाचं.. म्हणून प्रत्येकजण त्यांच्या स्वतःच्या जागी एक हिरो आहे. पण फक्त त्यांच्या स्वतःच्या पिढीसाठी. तुम्ही किती पिढ्यांचे ओझे वाहून नेणार आहात? त्यावरही अमिताभ यांनी अगदी चोख उत्तर दिलं. बिग बी यांचीही उत्तर सध्या सगळीकडे गाजत आहेत.

अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ते शेवटचे Vettaiyan मध्ये दिसले होते. आता ते रामायण चित्रपटात झळकणार आहेत. तर अभिषेक बच्चन नुकताच ‘हाउसफुल 5’ मध्ये दिसला. त्यात अक्षय कुमार, रितेश देशमुख, फरदीन खान, नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, रणजीत, जॉनी लीवर, जॅकलीन फर्नांडिस, नर्गिस फाखरी, चंकी पांडे, डिनो मोरिया, सोनम बाजवा आणि सौंदर्या शर्मा असे अनेक कलाकारही झळकले.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!.

Akhil Chitre : पाकिस्तानच्या बॉर्डरवर आलोय का? अखिल चित्रे पोलीस अधिकाऱ्यात जुंपली; आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं वातावरण तापलं!

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ.

मोदींच्या माफींची राहुल गांधींची नवी मागणी… मागण्यांमध्येच घोळ