AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेव्हा एक मार्ग बंद होतो..; अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट

अमोल कोल्हे यांनी 'मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले' ही मालिका बंद होण्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक व्हिडीओ पोस्ट केला आहे. येत्या 14 जूनपासून ही मालिका बंद होणार आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

जेव्हा एक मार्ग बंद होतो..; अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली मालिका, अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट
अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकरImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 05, 2026 | 9:23 AM
Share

स्टार प्रवाह वाहिनीवर अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ ही मालिका अचानक बंद करण्यात येत आहे. या मालिकेचा टीआरपी कमी असल्याने वाहिनीने ती बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी या वाहिनीने नुकतीच आठ नवीन मालिकांची घोषणा केली. त्याचवेळी अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांच्या मुख्य भूमिका असलेली ‘मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले’ ही मालिका अवघ्या 152 भागांमध्ये गुंडाळली. यासंदर्भात आता अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे.

अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर केला असून त्यात सुरुवातीला मालिकेतील एक दृश्य पहायला मिळतंय. ‘सगळंच संपलंय सावित्री..’ असं ज्योतिराव फुले सावित्रीबाईंना म्हणतात. तेव्हा सावित्रीबाईंच्याही डोळ्यात अश्रू तरळतात. ‘जेव्हा एक मार्ग बंद होतो तेव्हा कुठेतरी नवी सुरुवात खुणावत असते. थोडंसं थांबणं आवश्यक असतं. जरा निवांत होणं गरजेचं असतं. पुन्हा नव्याने गणितं मांडण्यासाठी, नव्या जोमाने झेपावण्यासाठी,’ असं कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिलं आहे. मालिका संपतेय पण गोष्ट सुरूच राहणार, असंही अमोल कोल्हेंनी या व्हिडीओमध्ये म्हटलंय. व्हिडीओत पुढे ते गाईंसोबत निवांत वेळ घालवताना, त्यांना कुरवाळताना दिसत आहेत. अमोल कोल्हेंच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. ही मालिका बंद करू नका, अशी विनंती अनेकांनी केली आहे.

अमोल कोल्हेंचा व्हिडीओ-

View this post on Instagram

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

‘सावित्रीबाई फुले’ मालिका म्हणजे आपल्या गौरवशाली इतिहासाचा आरसा आहे. आजच्या पिढीला याची खूप गरज आहे. ही मालिका बंद न करता पुढे चालू ठेवावी, ही नम्र विनंती,’ अशी मागणी एकाने केली. तर ‘शेवटी नेहमी सत्याचा विजय होतो. आपण करत असलेलं कार्य हे आज घरघरात गेलं आहे. साऊ जोतीचे विचार कधीच संपणार नाही, उलट ती ज्योत अजून झळकत राहील,’ असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘समाजाला सकारात्मक विचार देणाऱ्या मालिका दुर्मिळ असतात. मी सावित्रीबाई जोतीराव फुले ही त्यापैकीच एक आहे. अशा प्रेरणादायी कथा थांबू नयेत, मालिका सुरू ठेवा,’ अशी विनंती नेटकऱ्यांनी केली आहे.

14 जून 2026 पासून ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. टीआरपीचं कारण देत अवघ्या पाच महिन्यात ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेच्या जागी ‘सुना येती घरा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत