AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनराजनंतर आता ‘अनुपमा’मधील आणखी एका तगड्या कलाकाराची एक्झिट

'अनुपमा' या लोकप्रिय मालिकेतून आणखी एक कलाकार बाहेर पडणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या कलाकाराने खुलासा केला. भूमिका साकारण्यात पहिल्यासारखी मजा येत नसल्याचं कारण संबंधित कलाकारने दिलं आहे.

वनराजनंतर आता 'अनुपमा'मधील आणखी एका तगड्या कलाकाराची एक्झिट
Anupamaa teamImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 16, 2024 | 4:02 PM
Share

‘अनुपमा’ ही टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. लॉकडाऊनमध्ये सुरू झालेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. यातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नुकतंच या मालिकेच्या चाहत्यांना एक मोठा धक्का बसला होता. कारण त्यात वनराजची भूमिका साकारणारा अभिनेता सुधांशू पांडेनं अचानक ही मालिका सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता आणखी एक कलाकार या मालिकेतून बाहेर पडणार असल्याचंही कळतंय. काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदालसा शर्मा मालिकेचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. ही मालिका जेव्हा सुरू झाली, तेव्हा मदालसा त्यात नकारात्मक भूमिकेत झळकली होती. मात्र हळूहळू तिच्या भूमिकेचं स्वरुप बदलत गेलं.

मदालसा ही ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची सून आहे. मालिकेत ती वनराज शाहच्या दुसऱ्या पत्नीच्या भूमिकेत आहे. काव्या या भूमिकेचं मालिकेत बरंच महत्त्व होतं. परंतु जसजसं कथानक बदलत गेलं, तसतसं तिच्या भूमिकेचंही महत्त्व बदलत गेलं. सुरुवातीला अनुपमाच्या विरोधात असणारी काव्या आता मालिकेत तिची खास मैत्रीण बनली आहे. मालिका सोडण्यामागचं कारण मदालसाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत मदालसा म्हणाली, “जेव्हा मी या मालिकेत काम करायला सुरुवात केली होती, तेव्हा काव्याची भूमिका ही सक्षम आणि स्वतंत्र महिलेची होती. एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडण्याचं धाडस तिच्यामध्ये होतं. तिच्या भूमिकेला नकारात्मक छटा होती. कथानकानुसार त्यात बरेच बदल होत गेले. आता मालिकेची कथासुद्धा वनराज, अनुपमा आणि काव्या यांच्यासंबंधीची राहिली नाही. ही भूमिका साकारण्यात आता पहिल्यासारखी मजा येत नाही. जर काव्याच्या भूमिकेला आधीसारखंच महत्त्व असतं, तर मी या मालिकेत थांबली असती.” मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमने काव्याच्या भूमिकेत काही बदल करण्याचा प्रयोग केला, मात्र तो यशस्वी ठरला नसल्याची भावना मदालसाने बोलून दाखवली.

‘अनुपमा’ या मालिकेला आतापर्यंत तोषूची भूमिका साकारणारा आशिष मल्होत्रा, समर शाहच्या भूमिकेतील अभिनेता पारस कलनावत, पाखीच्या भूमिकेतील अभिनेत्री मुस्कान बामणे या कलाकारांनी रामराम केला आहे. या मालिकेत रुपाली गांगुली, गौरव खन्ना, निधी शाह मुख्य भूमिकेत आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.