AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ए. आर. रेहमान यांच्या घटस्फोटावर मुलींची प्रतिक्रिया, म्हणाल्या, ‘आम्हाला आनंद होईल जेव्हा…’

AR Rahman And Saira Banu Divorce: लग्नाच्या 29 वर्षांनंतर ए. आर. रेहमान - सायरा बानू यांचा घटस्फोट, चाहत्यांना धक्का, पण मुली असं का म्हणाल्या, 'आम्हाला आनंद होईल जेव्हा...'

ए. आर. रेहमान यांच्या घटस्फोटावर मुलींची प्रतिक्रिया, म्हणाल्या, 'आम्हाला आनंद होईल जेव्हा...'
| Updated on: Nov 20, 2024 | 8:50 AM
Share

AR Rahman And Saira Banu Divorce: भारताचे लोकप्रिय व ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रेहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानू यांनी लग्नाच्या 29 वर्षांनंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यामुळे चाहत्यांनी देखील मोठा धक्का बसला आहे. सांगायचं झालं तर, खुद्द ए आर रेहमान यांनी पत्नीपासून विभक्त होत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान त्यांच्या मुलांची देखील आई – वडिलांच्या घटस्फोटावर प्रतिक्रिया समोर येत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे.

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या घटस्फोटावर मुलींची प्रतिक्रिया

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांना तीन मुलं आहेत. दोन मुली आणि एक मुलगा. ए आर रेहमान यांची लेक रहीमा सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत म्हणाली, ‘आम्हाला प्रचंड आनंद होईल जेव्हा तुम्ही प्रत्येक जण आमच्या गोपनीयतेचा आदर कराल…’, दुसऱ्या मुलीने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

आई – वडिलांच्या घटस्फोटावर लेक खातीजा म्हणाली, ‘आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतोय, कठीण काळात आमच्या गोपनीयतेचा सन्मान करा… आम्हाला समजून घेण्यासाठी आभार…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ए आर रेहमान यांच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

सायरा बानू यांचं जनतेला आवाहन

नात्यातील वेदनांमुळे आपण हा निर्णय घेतल्याचे सायरा बानू यांनी आवर्जून सांगितलं आहे. सायरा या आव्हानात्मक काळात लोकांकडून गोपनीयता आणि समजून घेण्याची विनंती करत आहेत. कारण सायरा बानू त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि आव्हानात्मक टप्प्यातून जात आहेत…

का घेतला घटस्फोटाचा निर्णय?

सायरा बानू यांच्या वकील वंदना शाह यांनी एक निवेदन जारी केलं आणि घटस्फोटाची घोषणा केली. ‘अनेक वर्षांच्या लग्नानंतर मिसेस सायरा यांनी पती ए आर रहमान यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. नात्यात आलेल्या तणावामुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.’ असं वकील म्हणाल्या.

ए आर रेहमान आणि सायरा बानू यांच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 29 वर्षांपूर्वी दोघांनी लग्न केलं. 1995 मध्ये ए आर रेहमान आणि सायरा बानू यांचं लग्न झालं. दोघांनी घरच्यांच्या सहमतीने अरेंज मॅरेज केलं होतं. पण आयुष्यात कठीण वळण आलं आणि दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.