AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती पाणी मागत राहिली पण मी..; अर्शद वारसीने सांगितली आईची अखेरची आठवण, आजही होतो पश्चात्ताप

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता अर्शद वारसी त्याच्या आईविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. अखेरच्या क्षणी आईने पाणी मागितलं होतं, पण मी.. असं म्हणत त्याने पश्चात्ताप व्यक्त केला. अर्शद 14 वर्षांचा असतानाच त्याच्या आईवडिलांचं निधन झालं होतं.

ती पाणी मागत राहिली पण मी..; अर्शद वारसीने सांगितली आईची अखेरची आठवण, आजही होतो पश्चात्ताप
अर्शद वारसीImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 30, 2025 | 10:41 AM
Share

पडद्यावर विनोदी भूमिका साकारून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता अर्शद वारसी त्याच्या खासगी आयुष्याविषयी फार क्वचितच व्यक्त होतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, तो पहिल्यांदाच त्याच्या आईबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. अर्शद 14 वर्षांचा असतानाच त्याच्या आईवडिलांचं निधन झालं होतं. “मी आतून पूर्णपणे खचलो होतो, परंतु जगासमोर मी स्वत:ला खूप स्ट्राँग दाखवत होतो”, असं अर्शद म्हणाला. अर्शदने त्याच्या आईच्या अखेरच्या क्षणातील अशी आठवण सांगितली, ज्यामुळे त्याला आजही पश्चात्ताप जाणवतो.

राज शमानीच्या पॉडकास्ट मुलाखतीत अर्शद म्हणाला, “कुटुंबीयांसोबत माझ्या फारशा आठवणी नाहीत. कारण माझं बालपण बोर्डिंग स्कूलमध्येच गेलंय. त्यामुळे लहानपणाचा कधी विषय निघाला, तर मला माझ्या शाळेची फार आठवण येते. कारण मी वयाच्या आठव्या वर्षीच बोर्डिंग स्कूलमध्ये गेलो होतो.” यानंतर पुढे त्याने आईच्या अखेरच्या क्षणातील हृदय पिळवटून टाकणारी आठवण सांगितलं. ते अखेरचे क्षण आठवले की आजही खूप त्रास होतो, असं तो म्हणाला. अर्शदच्या वडिलांच्या निधनानंतर त्याच्या आईची किडनी निकामी झाली होती. त्यांना डायलिसिसवर रहावं लागलं होतं.

“माझी आई सामान्य गृहिणी होती. ती जेवण खूप छान बनवायची. त्यांची किडनी फेल झाल्याने डायलिसिसवर राहावं लागलं होतं. त्यांना पाणी प्यायला देऊ नका, असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं. परंतु ती सतत आमच्याकडे पिण्यासाठी पाणी मागायची. मी तिला सतत नकार द्यायचो. निधनाच्या आदल्या रात्री तिने मला बोलावलं आणि पुन्हा माझ्याकडे पाणी मागितलं. त्याच रात्री तिने अखेरचा श्वास घेतला आणि त्या घटनेचा परिणाम माझ्या मनावर खोलवर झाला होता. माझ्या डोक्यात आजही असा एक विचार येतो की, जर मी त्या रात्री आईला पाणी दिलं असतं आणि त्यानंतर तिचं निधन झालं असतं, तर मला आयुष्याभर त्याच गोष्टीने सतावलं असतं की आईला मी पाणी दिल्याने तिचं निधन झालं”, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.

याविषयी त्याने पुढे सांगितलं, “आता मला असं वाटतं की आईला मी पाणी द्यायला पाहिजे होतं. तेव्हा मी लहान होतो आणि डॉक्टरांनी जे सांगितलं ते मी ऐकलं होतं. आज मी माझे निर्णय घेऊ शकतो. माझ्या आयुष्यातील अखेरचे क्षण रुग्णालयात घालवण्यापेक्षा मी कुटुंबीयांसोबत घालवणं पसंत करेन. आपण कधीच आजारी व्यक्तीचा विचार करत नाही. आपण फक्त आपल्या अपराधीपणाच्या भावनेतून निर्णय घेतो. आईवडिलांच्या निधनानंतर मी फारसा रडलो नाही. कारण मी स्ट्राँग आहे, असं मला दाखवायचं होतं. परंतु काही दिवसांनंतर जेव्हा मला जाणवलं की खरंच आपल्याजवळ आई किंवा बाबा नाहीत, तेव्हा मी धाय मोकलून रडलो होतो.”

Follow Us
हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले.....
Sanjay Raut On Bal Mane | हिंदुत्ववादी म्हणवणारे काही लोक गद्दारीसाठी एकत्र आले; बाळ माने यांच्या माघारीनंतर संजय राऊतांचा घणाघात
नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका?; काय घडतंय पडद्यामागे?
Navneet Rana | नवनीत राणांना राज्यसभेची लॉटरी की झटका? राष्ट्रवादीच्या भूमिकेने... काय घडतंय पडद्यामागे?
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge.....
ठाकरेंनी काढलं, मानेंनी दिलं उत्तर; म्हणाले Revenge..... त्या एका पोस्टनं पेटलं राजकारण!
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल