AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडचा निरोप घेत स्वीकारला संन्यास, केलं टक्कल पण अपघातानंतर असं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री

Actress Life: संन्यास स्वीकारल्यानंतर त्याने मला टक्कल करायला सांगितलं आणि..., अभिनेत्रीने सांगितलं स्वतःच्या आयुष्यातील मोठं रहस्य, अपघातानंतर आता असं जगतेय आयुष्य..., सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या आयुष्याची चर्चा...

बॉलिवूडचा निरोप घेत स्वीकारला संन्यास, केलं टक्कल पण अपघातानंतर असं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री
फाईल फोटो
| Updated on: May 19, 2025 | 8:24 AM
Share

Actress Life: बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या एका रात्रीत प्रसिद्धी झोतात आल्या. पण त्यांची लोकप्रियता फार काळ टिकली नाही. अशात अनेक अभिनत्रींनी लग्न करत संसार थाटला, तर काही अभिनेत्री आयुष्यभर एकटं राहण्याचा विचार केला. पण एक अभिनेत्री अशी देखील जिने असंख्य चाहते असताना आणि करीयर उच्च शिखरावर असताना संन्यास स्वीकारण्याचा निर्णय घेतला. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही ‘आशिकी’ फेम अभिनेत्र अनू अग्रवाल आहे.

अनू अग्रवाल आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं आहे. 1998 मध्ये झालेल्या गंभीर अपघातापूर्वीच अनूने संन्यास स्वीकारला होता.

मुलाखतीत अनू म्हणाली, ‘मी कधीच पैशांसाठी सिनेमांमध्ये काम केलं नाही. मी एकटीच राहायची. मला फक्त चांगलं काम करायचं होतं आणि ते झाल्यानंतर मी बॉलिवूडचा निरोप घेतला. एका गुरुजींनी मला सांगितलं होतं की, हजारोंमध्ये एका संन्यासी मानसिकतेचा असतो. ज्यांनी कसलीच ओढ नसते. तेव्हा मी म्हणाले मला माझी कॉफी सर्वात जास्त प्रिय आहे.’

‘तेव्हा त्यांनी मला अनेक गोष्टी समजावून सांगितल्या. मी आनंदी होती पण तेवढ्यात त्यांनी मला टक्कल करण्यास सांगितलं. मला टक्कल करणारी गोष्ट पटली नाही. पण घरी आल्यानंतर मी विचार केला की, बॉलिवूडमध्ये तर आता काम करायचं नाही. त्यामुळे कशाला हवे आहेत केस…’

‘बॉलिवूड तर मी सोडूनच दिलं होतं. अशात मी अध्यात्माबद्दल अनेक गोष्टी वाचू लागली. तरी देखील माझ्यातली शक्ती मी शोधू शकत नव्हती. मी सर्व वेद – ग्रंथ वाचले आहे. पण लोकांनी माझा पाठलाग करणं सोडलं नाही. अपघात झाला तेव्हा मी मानसिक तणावात होती. तेव्हा शरीराचं तुटणं देखील गरजेचं होतं. बॉलिवूड सोडल्यानंतर बराच काळ मी टक्कल करुन संन्यासाचं आयुष्य जगत होती. फक्त सर्वांना योगा शिकवायची.’ असं देखील अनू म्हणाली होती.

अनू अग्रवाल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘आशिकी’ सिनेमातून यश मिळाल्यानंतर अभिनेत्रीने ‘गदब तमाशा’, ‘किंग अंकल’, ‘राम शास्त्र’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम केलं होतं. पण कार अपघातानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक बदल झाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.