AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सी-सेक्शन, पती-पत्नीच्या नात्याबद्दल सुनील शेट्टींची वादग्रस्त वक्तव्ये; अखेर लेकीनेच फटकारलं

अभिनेते सुनील शेट्टी यांना त्यांच्या लेकीने चांगलंच फटकारलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या मुलाखती सतत चर्चेत आहेत. कधी सी-सेक्शन डिलिव्हरी तर कधी पती-पत्नीच्या नात्याबद्दल त्यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली होती.

सी-सेक्शन, पती-पत्नीच्या नात्याबद्दल सुनील शेट्टींची वादग्रस्त वक्तव्ये; अखेर लेकीनेच फटकारलं
Athiya Shetty and Suniel ShettyImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 30, 2025 | 9:19 AM
Share

अभिनेते सुनील शेट्टी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. या वक्तव्यांमुळे त्यांना बऱ्याच ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. मुलगी अथिया शेट्टीच्या नॉर्मल डिलिव्हरीनंतर त्यांनी सर्वांना सी-सेक्शनपासून वाचण्याचा सल्ला दिला होता. इतकंच नव्हे तर पतीने त्याचं करिअर बनवावं आणि पत्नीने मुलाबाळांची देखभाल करावी, असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या मतांवरून नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली होती. त्यानंतर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुनील यांनी सांगितलं की, त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर मुलगी अथियाचं पूर्ण लक्ष असतं आणि काही चुकीचं म्हटल्यास ती त्यांना फटकारते.

‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सुनील शेट्टी म्हणाले, “मी प्रमोशनल कार्यक्रमांदरम्यान सहसा वादग्रस्त प्रश्नांपासून वाचण्याचा प्रयत्न करतो. मी अशा पद्धतीचा माणूस आहे जो कधी-कधी उत्तर देऊ इच्छितो आणि मग त्यातच गडबड होते. मग घरी अथिया फटकारते, पापा, तुम्ही असं का म्हणालात? फक्त नो कमेंट म्हणा. ती मला सतत या गोष्टीची आठवण करून देते की मी असं काही म्हणू नये, ज्यामुळे दुसऱ्या दिवशी माझ्यासमोर समस्या उभी राहील. तिचं माझ्या मुलाखतींवर विशेष लक्ष असतं. खरं सांगायचं झालं तर, मला फक्त तिचीच भीती वाटते. एका व्यक्तीसाठी सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे त्याच्या आयुष्यात एक मुलगी असणं.”

याआधी दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, “आजकालच्या काळात सर्वजण सी-सेक्शनची निवड करत असताना माझ्या मुलीने नॉर्मल डिलिव्हरीचा पर्याय निवडला. रुग्णालयातील प्रत्येक नर्स आणि डॉक्टरांनी म्हटलं होतं की, ज्या प्रकारे ती संपूर्ण प्रक्रियेला सामोरी गेली, ते अविश्वसनीय आहे. एक वडील म्हणून माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे.” या वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यांना ट्रोल केलं होतं. अभिनेत्री गौहर खाननेही त्यांच्या मतावर नाराजी व्यक्त केली होती.

“मी हे स्पष्टपणे सांगू इच्छिते की नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सी-सेक्शन.. यापैकी एकाची निवड करणं हे महिलेच्या हातात नसतं. काही महिला नॉर्मल डिलिव्हरी करू शकतात, तर काहींसाठी ते शक्य नसतं. अनेकदा मेडिकल परिस्थितीमुळे डॉक्टरांना निर्णय घ्यावा लागतो. आई आणि बाळ दोघांची सुरक्षा महत्त्वाची असते. सी-सेक्शन काही शॉर्टकट नाही. ही फक्त एक गरज असून ते संपूर्णपणे नैसर्गिक आहे. जरी महिला सी-सेक्शनचा पर्याय निवडत असतील तरी तो कोणत्याच अर्थाने सोपा पर्याय नाही. हा केवळ लोकांचा गैरसमज आहे”, अशा शब्दांत तिने नाव न घेता सुनील शेट्टी यांना फटकारलं होतं.

Follow Us
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?
एलपीजी पुरवठ्याची संपूर्ण यंत्रणा कोलमडली, सरकार कबूल का करत नाही?.
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम
महानगर गॅसची २०% कपात; मुंबईतील हॉटेल्स आणि उद्योगांवर परिणाम.
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी....
माणसं मारण्यात मजा येते म्हणणाऱ्या राष्ट्राशी करार, राऊतांचा मोदी.....
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?
बारामती, राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? कधी आहे मतदान?.
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख
निवडणूक आयोगाने जाहीर केली बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची तारीख.
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर
पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ विधानसभा निवडणुकीसाठी तारीखा जाहीर.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद.
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर
पुणे मेट्रोला नागरिकांचा चांगला प्रतिसाद; प्रवासी संख्या अडीच लाखांवर.