AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा, अभिनेत्रीने थेट व्यक्तीची भेट घेत..

Aishwarya Rai and Abhishek Bachchan Marriage : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय फक्त तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळेही सध्या तूफान चर्चेत आहे. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला इतका मोठा काळ झाल्यानंतर यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा रंगत आहेत.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा, अभिनेत्रीने थेट व्यक्तीची भेट घेत..
Aishwarya Rai and Abhishek Bachchan
| Updated on: Dec 01, 2025 | 11:56 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हे नाव कायमच चर्चेत असणारे आहे. ऐश्वर्या राय हिने अनेक हीट चित्रपट बॉलिवूडला दिली असून तिची जबरदस्त फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय हिच्या खासगी आयुष्यात नेमके काय घडते, यावरही तिच्या चाहत्यांच्या बारीक नजरा असतात. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नानंतर त्यांच्या खासगी आयुष्यात आता वादळ आल्याची तूफान चर्चा रंगताना दिसली. मात्र, यावर ऐश्वर्या किंवा अभिषेक यांनी अजिबातच भाष्य केले नाही. ऐश्वर्या राय हिला अभिषेक बच्चन याने प्रपोज केला होता. त्यावेळी दोघे विदेशात एका चित्रपटाची शूटिंग करत होते. त्यानंतर 2007 मध्ये ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी मुंबईत अत्यंत थाटामाटात मोठं लग्न केलं. ते लग्न त्यावेळीचे सर्वाधिक चर्चेत असणारे लग्न ठरले.

काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या राय आंध्र प्रदेशातील पुट्टपार्थी येथे श्री सत्य साई बाबा यांच्या शताब्दी समारंभाला पोहोचली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते. ऐश्वर्या राय या भाषणात आपल्या आयुष्यात श्री सत्य साई बाबा यांचे किती जास्त महत्व आहे हे सांगताना दिसली. हेच नाही तर ऐश्वर्या राय हिने तिच्या आयुष्यातील अनेक महत्वाची निर्णय श्री सत्य साई बाबा यांना विचारूनच घेतल्याचे सांगितले जाते.

अभिषेक बच्चन याने लग्नासाठी प्रपोज केल्यानंतर ऐश्वर्या राय हिने श्री सत्य साई बाबा यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. ऐश्वर्या राय हिने श्री सत्य साई बाबा यांना विचारून आणि त्यांच्यासोबत चर्चा करून अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्री सत्य साई बाबा यांनी अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करणे योग्य असल्याचे सांगितले आणि त्यानंतर तिने अभिषेक बच्चनला याला लग्न करण्यास होकार दिला.

ऐश्वर्या राय हिची श्री सत्य साई बाबा यांच्यावर मोठी श्रद्धा आहे. ती श्री सत्य साई बाबा यांच्या कार्यक्रमांना कायमच उपस्थित राहते. ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर सलमान खान याला डेट केले. मात्र, दोघांचे एक अत्यंत वाईट वळणावर ब्रेकअप झाले. त्यानंतर काही दिवसांमध्येच ऐश्वर्याने अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न केले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.