AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जाती-धर्मावर आधारलेली इंडस्ट्री, महिलांना तर एखाद्या फर्नीचर प्रमाणे…, बॉलिवूड अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य

Bollywood: पितृसत्ताक इंडस्ट्रीमध्ये जाती-धर्मावर होतो भेदभाव, कोणी कुठे बसायच काय खायचं? सर्वकाही ठरलेलं असतं, महिलांना तर एखाद्या फर्नीचर प्रमाणे..., बॉलिवूड अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य

जाती-धर्मावर आधारलेली इंडस्ट्री, महिलांना तर एखाद्या फर्नीचर प्रमाणे..., बॉलिवूड अभिनेत्रीचं धक्कादायक वक्तव्य
| Updated on: Oct 12, 2024 | 12:04 PM
Share

बॉलिवूडमधील अनेक चांगल्या गोष्टी अनेकांना आकर्षित करत असतात. पण झगमगत्या विश्वातील काही धक्कादायक सत्य आणि रहस्य समोर आल्यानंतर चाहत्यांच्या भुवया उंचावतात. अनेक अभिनेत्री बॉलिवूडबद्दल अनेक चांगल्या – वाईट गोष्टी सांगत असतात. आता अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिने देखील बॉलिवूडचं मोठं सत्य समोर आणलं आहे. बॉलिवूडमध्ये देखील धर्म आणि जातीच्या आधारावर भेदभाव होतो असा कोणी विचार देखील केला नसेल. इंडस्ट्री पितृसत्ताक असली तरी त्यात जात आणि वर्गाच्या आधारावर भेदभाव केला जातो, असा खुलासा अभिनेत्रीने केला आहे.

कोंकणा म्हणाली की, हे लोक माणसाची जात आणि वर्ग ठरवतात, त्यांना कुठे बसायचे आणि कोणते पदार्थ खायला दिले पाहिजे हे देखील ठरवलं जातं… नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कोंकणा हिने इंडस्ट्रीचं सत्य सांगितलं आहे. शिवाय इंडस्ट्रीमध्ये महिलांना कशी वागणूक मिळते? यावर देखील अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे.

कोंकणा म्हणाली, ‘इंजस्ट्रीमध्ये सर्वत्र भेदभाव केला जातो. माझ्या सांगण्याचा अर्थ म्हणजे खाण्यापिण्याबद्दल देखील याठिकाणी भेदभाव होतो. कोणी कुठे बसायला हवं. कोणाला कुठे बसण्याची परवानगी नाही? काय खायची परवानगी नाही? कोणाचा बाथरुम कुठे आहे?’

महिलांबद्दल देखील अभिनेत्रीने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सेटवर फक्त प्रसिद्ध आणि दिग्गज सेलिब्रिटींना मान मिळतो. इतरांना एखाद्या फर्नीचर सारखी वागणूक दिली जाते. त्याना धक्के देखील जातात. अशा वातावरणात काम करणं प्रचंड कठीण असतं. कोणी कल्पना देखील करु शकत नाही की, इंडस्ट्रीमध्ये कोणत्या आणि कशा गोष्टींचा सामना करावा लागतो…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

कोंकणा सेन शर्मा हिचं खासगी आयुष्य

कोंकणा हिने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण अभिनेत्री हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. खासगी आयुष्यात देखील अभिनेत्रीने अनेक संकटांचा सामना केला. अभिनेत्रीने 2007 मध्ये रणवीर शौरीला डेट करायला सुरुवात केली होती. ते दोघे लिव्ह इन मध्ये रहात होते. 2010 साली ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट होती, त्यानंतर रणवीर आणि कोकणा यांचे लग्न झालं.

लग्नानंतर कोंकणा हिने 2011 मध्ये मुलाला जन्म दिला. पण मुलाच्या जन्मानंतर देखील कोंकणा – रणवीर नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.