AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

The Kashmir Files: प्रभासला ‘द काश्मीर फाइल्स’ची जोरदार टक्कर; निवडक शो असूनही चांगली कमाई

अनुपम खेर (Anupam Kher) यांची मुख्य भूमिका असलेला 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात 1990 च्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली आहे.

The Kashmir Files: प्रभासला 'द काश्मीर फाइल्स'ची जोरदार टक्कर; निवडक शो असूनही चांगली कमाई
The Kashmir Files Image Credit source: Instagram
| Updated on: Mar 12, 2022 | 12:09 PM
Share

अनुपम खेर (Anupam Kher) यांची मुख्य भूमिका असलेला ‘द काश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट 11 मार्च 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात 1990 च्या नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली आहे. भारतीय इतिहासातील सर्वात दुःखद घटनांपैकी ही एक घटना आहे. या चित्रपटाच्या पॉवर-पॅक ट्रेलरने काश्मीरमध्ये धडकी भरवणाऱ्या दहशतीची, गोंधळाची झलक दाखवून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर त्याची चर्चा होऊ लागली. स्पेशल स्क्रिनिंगमध्ये प्रेक्षकांचे डोळे पाणावले. या सर्वांचा परिणाम चित्रपटाच्या कमाईवरही झाला. देशभरात निवडक शो असूनही विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 3.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. देशभरात जवळपास 630 स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसाचा आकडा पाहता दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही चांगली कमाई होऊ शकेल, असा अंदाज तरण आदर्शने व्यक्त केला आहे.

विवेक रंजन अग्निहोत्री लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री पल्लवी जोशी, प्रकाश बेलवाडी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, भाषा सुंबळी, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वी सरनाविक यांसारख्या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिल्यानंतर सत्य समोर येईल, असा दावा विवेक अग्निहोत्री यांनी केला होता. काश्मीरच्या समस्येवरील निराकरणाला राजकारणाशी जोडून पाहणं चुकीचं ठरेल, असं ते म्हणाले होते. लोकशाहीत राजकारण हे व्होट बँकवर चालतं. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये पंडितांची व्होट बँक नाही, त्यामुळे कदाचित त्या समस्येचं निराकरण होऊ शकलं नाही, असं ते जम्मूमध्ये म्हणाले होते.

हेही वाचा:

आठवणीही नकोत; समंथाने नाग चैतन्यला परत केली लग्नातली साडी?

नागराजमुळे त्या पठ्ठ्याचं आयुष्यच बदललं; 20 वर्षीय मुलाचं स्वप्न साकार

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.