AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sirf Ek Bandaa Kaafi Hai : मनोज वाजपेयी याच्या चित्रपटावर बंदी घाला, आसाराम बापू याची मागणी; काय आहे प्रकरण?

आसाराम बापू याच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. मनोज वाजपेयीने या सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. या सिनेमावर आसाराम ट्रस्टने आक्षेप घेतला असून सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केल्याचं वृत्त आहे.

Sirf Ek Bandaa Kaafi Hai : मनोज वाजपेयी याच्या चित्रपटावर बंदी घाला, आसाराम बापू याची मागणी; काय आहे प्रकरण?
Manoj BajpayeeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 10, 2023 | 6:28 AM
Share

मुंबई : वेगळ्या धाटणीच्या आणि दर्जेदार अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असलेला अभिनेता मनोज वाजपेयी पुन्हा एकदा एका नव्या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. मनोज वाजपेयीची ‘सिर्फ एक बंदा काफी है’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर 8 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून हा संपूर्ण चित्रपट आसाराम बापू आणि 16 वर्षाच्या बलात्कार पीडित मुलीला न्याय देणाऱ्या वकिलावर आधारित असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या ट्रेलरची प्रचंड चर्चा सुरू आहे.

या सिनेमात मनोज वाजपेयी वकिलाच्या भूमिकेत दिसत आहे. बलात्कार पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी मनोज वाजपेयी कोर्टात केस लढताना दिसत आहेत. जोरदार युक्तिवाद करताना दिसत आहे. नेहमीप्रमाणे या व्यक्तिरेखेतही मनोज वाजपेयी घुसल्याचं ट्रेलर पाहून लक्षात येतं. या सिनेमाचा ट्रेलर प्रचंड ताकदीचा झाला आहे. मात्र, या सिनेमाचा ट्रेलर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आसाराम बापू ट्रस्टने सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावल्याचं वृत्त आहे.

वकिलाचा युक्तिवाद काय?

हा सिनेमा आक्षेपार्ह आहे. त्यामुळे आसाराम बापूच्या सन्मानाला ठेच पोहोचू शकते. त्यांची बदनामी होऊ शकते. तसेच त्याच्या भाविकांच्या भावानांना ठेच पोहोचू शकते, असं आसारामच्या वकिलाचं म्हणणं असल्यातचं वृत्त आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसह त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आसारामच्या वकिलाने केली आहे.

अपूर्व सिंह कार्की या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. तर आसिफ शेख हे निर्माते आहेत. मनोज वाजपेयी या सिनेमात वकील पीस सोळंकी यांची व्यक्तिरेखा साकारत आहे. या व्यक्तिरेखेत मनोज वाजपेयीने संपूर्ण जीव ओतल्याचं ट्रेलर पाहून कळतं. आसाराम ट्रस्टने लीगल नोटीस दिल्यानंतर आता हे प्रकरण कोणत्या वळणावर जातं हे पाहावं लागमार आहे.

ओटीटीवर रिलीज होणार

दरम्यान, या सिनेमाचा ट्रेलर पाहून सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सिनेमातील प्रत्येक व्यक्तीरेखा दमदार झाली आहे. सर्वांनीच अफलातून काम केलं आहे. येत्या 23 मे रोजी हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. ओटीटी शिवाय हा सिनेमा काही थिएटर्समध्येही रिलीज होणार आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक