AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हेरा फेरी 3’ चित्रपटाचा घोळ संपेना, अक्षय कुमार की कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत?

चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याने चित्रपटाला नकार दिल्याचे अक्षय कुमार याच्याकडून सांगण्यात आले.

'हेरा फेरी 3' चित्रपटाचा घोळ संपेना, अक्षय कुमार की कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत?
| Updated on: Dec 15, 2022 | 3:27 PM
Share

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अक्षय याने हेरा फेरी 3 हा चित्रपट करण्यास नकार दिला. यानंतर अनेकांनाच मोठा धक्का बसला. चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून परत एकदा हेरा फेरी चित्रपटामध्ये अक्षयची धमाल पाहण्यास इच्छुक आहेत. चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली नसल्याने चित्रपटाला नकार दिल्याचे अक्षय कुमार याच्याकडून सांगण्यात आले. परंतू एक चर्चा आहे की, हेरा फेरी 3 साठी अक्षयला हवी ती फी मिळत नसल्याने त्याने चित्रपटाला नकार दिला.

अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 ला नकार दिल्याने लगेचच फिरोज नाडियाडवाला याने अक्षयच्या जागी पर्याय शोधला असून कार्तिक आर्यन हा अक्षय कुमार ऐवजी चित्रपटामध्ये दिसणार असल्याचे जवळपास फायनल आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

रिपोर्टनुसार चित्रपटाच्या दोन स्क्रीप्ट तयार करण्यात आल्या आहेत. एक अक्षय कुमार प्रमाणे आणि दुसरी कार्तिक आर्यनसाठी. अजूनही चित्रपट हेरा फेरीच्या निर्मात्यांना अपेक्षा आहेत की, अक्षय कुमार हा चित्रपटासाठी होकार देईल.

फिरोज नाडियाडवाला हे अक्षय कुमार याच्या संपर्कात असून चर्चा सुरू आहे. दुसरी टीम कार्तिक आर्यनच्या संपर्कात आहे. म्हणजे असूनही हे फायनल होऊ शकले नाहीये की, हेरा फेरी 3 मध्ये नेमका कोणता हिरो मुख्य भूमिकेत आहे.

सोशल मीडियावर जेंव्हापासून हे कळाले की अक्षय कुमार हा हेरा फेरी 3 मध्ये दिसणार नाही. तेंव्हापासून फिरोज नाडियाडवाला यांच्यावरील दबाव वाढला आहे. चाहते अक्षय कुमारलाच हेरा फेरी 3 मध्ये पाहू इच्छित आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.